Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Air Pollution Environment Demand | आमचे आरोग्य तुमच्या जाहीरनाम्यात दिसू द्या: ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ संघटना आक्रमक; खुलेआम जळतोय कचरा, सार्वजनिक वाहतूक ‘पंक्चर’ – Chhatrapati Sambhajinagar News


छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणाकडे व त्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी जागरूक नागरिकांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पर्यावरण आणि पर्यायाने शुद्ध हवेशी संबंधित मुद्यांना स्थान देऊन कृत

.

शहरात खुलेआम कचरा जाळला जातो, सर्व वाहतूक सिग्नलला टायमर नाहीत. बसची संख्या तोकडी आहे, स्मशानभूमीतील प्रदूषणाबाबत उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत, बांधकाम करतानाचे नियम पाळले जात नाहीत, पार्किंगच्या जागा बेकायदा विकल्याने कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. यामुळे शहरात पीएम 2.5 आणि पीएम 10 ची स्थिती वर्षभरात जवळजवळ 200 ते 290 दिवस खराब राहिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हवेचा दर्जा दर्शवणा-या तीन पैकी एका केंद्राची माहिती नियमित मिळतच नाही.

या गंभीर विषयाला राजकारणी महत्त्व देत नाहीत. त्यामुळे विविध संस्थांच्या या मंचने एक पत्र राजकीय पक्षांना पाठवले. प्रत्यक्ष भेटी घेण्याचाही प्रयत्न आहे. पत्राला आमदार संजय केणेकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत सविस्तर चर्चा केली. शिवाय पक्षाला पत्र लिहिणार असल्याचे स्पष्ट केले.

दमा, कॅन्सर, हृदय रोग ते मधूमेह

हवेचे प्रदूषण आता केवळ पर्यावरणाशी संबंधित समस्या राहिलेली नाही, तर ती सार्वजनिक आरोग्य, उपजीविका आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित गंभीर संकट बनली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उघड्यावर काम करणारे कामगार, विक्रेते आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना बसतो. हवा प्रदूषण म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण आहे. त्यामुळे लोकांमध्येही या अभियानातून जागृती होईल अशी ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ची अपेक्षा आहे.

जंबिदा ग्राऊंड बायपाससह शहरातील प्रत्येक भागा, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जातो. पालिकेचे पथक आणि अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने समस्या गंभीर

जंबिदा ग्राऊंड बायपाससह शहरातील प्रत्येक भागा, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जातो. पालिकेचे पथक आणि अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने समस्या गंभीर

सर्व पक्षांना, उमेदवारांना आवाहन

स्वच्छ हवा, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन या बाबींना निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये व कृतीत प्राधान्य देण्यात यावे, अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आपण तसे करत असाल तर कृपया 9049067888 या क्रमांकावर कळवावे. ‘जबाबदार उमेदवार’ म्हणून आपली दखल घेतली जाईल.

आपणही सहभागी व्हा

‘हवी शुद्ध हवा’ अभियान अनेक संस्था मिळून प्रत्यक्ष पालापाचोळा व्यवस्थापन करत आहे. यात औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा), रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इस्ट, इको ग्रीन, बेस्ट फाऊंडेशन, क्रेझी फ्रेंड्स ग्रुप, दीपशिखा फाऊंडेशन, ग्रीन बार्टर, प्लॉगर्स ग्रुप, जनसहयोग प्रतिष्ठान, गरवारे कम्युनिटी सेंटर, रीड ॲंड लीड फाऊंडेशन, अम्ब्रेला फाऊंडेशन, संडे क्लब, जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, अर्बन रिसर्च फाऊंडेशन यांचा सहभाग आहे. आपणही सहभागी होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *