Solapur BJP Internal Dispute Office Vandalism Police Action | सोलापूरमध्ये तिकीट वाटपावरून राडा: मनसे नेत्याची हत्या झाल्याचा जिल्हाप्रमुखांचा दावा; माजी नगरसेवकाचे कार्यालय फोडले – Solapur News



सोलापूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्याच कार्यकर्त्याने पक्षाचे कार्यालय फोडले असल्याची घटना समोर आली आहे. शहरातील जोशी गल्लीतील माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून परिसरात तणाव

.

या घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती अशी की, हा वाद भाजपच्याच दोन गटात झाला आहे. यातील एका गटातील कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्या गटाने कार्यकर्त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. कार्यालय फोडल्यानंतर सर्वत्र काचा पसरल्या होत्या. तसेच परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. समाजात तणाव नको म्हणून मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी मनसे जिल्हाप्रमुख दिलेल्या माहितीनुसार, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या काकू भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. परंतु, त्यांना तिकीट न मिळाल्याने याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे हे शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच यात त्यांचा मृत्यू झाल्याचाही दावा मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

बाळासाहेब सरवदेंवर जीवघेणा हल्ला

प्रभाग दोनमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांच्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादाला आता हिंसक वळण लागले. अर्ज माघारी घेण्यावरून दोन्ही गटांत झालेल्या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय फोडण्यात आले, तर याचवेळी मध्यस्थीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर शिंदे गटाच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरवदे यांना तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून दबाव आणला जात होता. समाजात वाद नको म्हणून ते सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे प्रशांत इंगळे यांनी केला आहे. मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *