Satara Marathi Literature Conference Inauguration Celebration Cultural Events | साताऱ्यात साहित्याचा जागर: ध्वजारोहणाने 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ! – Kolhapur News


ऐतिहासिक सातारा नगरीत ‘स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी’ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या संमेलनाचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात ध्वजारो

.

संमेलनाच्या पहिल्याच दिवशी ‘कवीकट्टा’ आणि ‘प्रकाशनकट्टा’ यांचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदा कवीकट्ट्यासाठी महाराष्ट्रासह जपान आणि अबुधाबी येथूनही कविता आल्या आहेत. एकूण १७६२ कवितांपैकी ४५० कवितांची निवड करण्यात आली असून, पुढील २२ तास २२ सत्रांमध्ये हा कवीकट्टा अविरतपणे सुरू राहणार आहे. ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले, तर गझलकट्ट्याचे उद्घाटन उद्योजक संदीप शहा यांच्या हस्ते पार पडले.

ग्रंथप्रदर्शनाने फुंकले संमेलनाचे बिगुल

संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. मुख्य सभामंडपाकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा असलेली प्रकाशन संस्थांची दालने यंदाच्या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. याचवेळी प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ‘बालवाचक कट्टा’ सुरू करण्यात आला, ज्याला शालेय विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

सांस्कृतिक वैविध्याची जोड

संमेलन परिसरात ग.दि. माडगुळकर, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांसारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कार्यकर्तृत्वाचे फलक लावण्यात आले असून ते उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, सोलापूरचे ६८ वर्षीय फुलचंद नागटिळक यांनी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत उपस्थित राहून लोकपरंपरा आणि साहित्याचे नाते अधोरेखित केले. या सर्व उपक्रमांमुळे साताऱ्यातील साहित्यनगरी रसिक आणि वाचकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *