.

खंडाळा हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून चळवळींचा वारसा लाभलेले आहे. येथे धार्मिकता आणि देशभक्ती यांचा संगम दिसतो. दिवसाची सुरुवात धार्मिक प्रार्थना, बुद्धवंदना आणि पूजांनी होते. गावातील १०० पेक्षा अधिक युवक नोकरी करतात. गावाच्या विकासाची धुरा या नोकरदार युवकांवर आहे. पूर्वी फक्त शेतीवर अवलंबून असलेले हे गाव आता शिक्षण आणि व्यवसायाच्या जोरावर प्रगती करत आहे. शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुट पालनामुळे अनेकांचे उत्पन्न वाढले. 20,000 जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंतर कनेक्टिव्हिटी : नाशिक -संभाजीनगर मार्ग, रोटेगाव स्टेशन केवळ ७ किमीवर प्रसिद्ध : सम्राट अशोक बुद्धविहार. वेगळेपण : स्वातंत्र्यपूर्व काळापासून खंडाळा गावाला चळवळींचा वारसा लाभलेले गाव.
