![]()
विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला केवळ मराठवाड्यातच नव्हे, तर विधान परिषदेतही फटका बसला असून विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्यावर आता टांगती तलवार निर्माण झा
.
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सातव कुटुंबातील सदस्याने भाजपची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजीव सातव यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप परिवारात सामील झाल्याचे डॉ सातव यांनी सांगितले. डॉ. सातव गेल्या काही काळापासून काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे नाराज होत्या.
७८ सदस्य संख्या असते
विरोधी पक्षनेते पदासाठी एखाद्या पक्षाला १० टक्के म्हणजे किमान ८ ते ९ सदस्य संख्या असावी लागते. विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळेल असे वाटत नाही. पूर्वी १९६७, १९७२, १९७७ च्या काळात काँग्रेस पक्षाला मोठ बहुमत मिळायचे त्यावेळी विरोधी पक्षाकडे तेवढे बहुमत नसायचे. त्यावेळी काही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा करायचे. त्यावेळेस त्यांना मान्यता मिळायची.
विधानसभेत २६ नोव्हेंबर २०२४ पासून हे पद रिक्त आहे. कारण कोणत्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक १० टक्के संख्याबळ नाही. विधान परिषदेत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे २९ ऑगस्ट २०२५ रोजी निवृत्त झाल्याने ते पद रिक्त आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती रखडली होती, मात्र १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यापैकी ७ जणांची नियुक्ती करण्यात आली.
