Kolhapur KMT Workers Permanent Decision Eknath Shinde | आचारसंहितेपूर्वी कोल्हापुरात आनंदाची लाट: केएमटीच्या 156 र्मचाऱ्यांना 35 वर्षांनंतर घेतले कायम सेवेत, एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही – Kolhapur News



राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधीच कोल्हापुरातील केएमटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. तब्बल 35 वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या 156 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर

.

महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार, याची कुणकुण लागताच महायुती सरकारने कोल्हापूरसाठी मोठा निर्णय घेतला. गेल्या साडेतीन दशकांपासून अनिश्चिततेच्या गर्तेत असलेल्या केएमटीच्या 156 कर्मचाऱ्यांच्या कायम करण्याच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली. या निर्णयाचे वृत्त समजताच कर्मचाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयासमोर जमून गुलालाची उधळण करत जल्लोष केला. अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत यावेळी आनंदाश्रू तरळले होते.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या रणनीतीवर भाष्य केले. कोल्हापूर व ईकरंजी येथे महायुती एकत्रच लढणार आहे. जागावाटपासाठी चंद्रकांत पाटील, महाडिक गट आणि आम्ही चर्चा करू. जो उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यालाच उमेदवारी हे सूत्र ठरले आहे.

तसेच पुण्यात भाजप हा मोठा भाऊ आहे. मात्र, बंडखोरी टाळण्यासाठी तिथे वेगळा प्रयोग होऊ शकतो. जर भाजप आणि शिवसेना एकत्र लढले, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढू शकते. यामुळे दोन्ही पक्षांतील नाराज उमेदवारांची सोय होईल आणि बंडखोरी कमी होईल, असा ‘फॉर्म्युला’ मुश्रीफ यांनी मांडला. मुंबईबाबतचा निर्णय मात्र अजित पवार घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *