![]()
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला महायुती हवीच आहे, पण ती सन्मानपूर्वकच व्हायला हवी. भाजपला जितक्या जागा, तितक्याच जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत, असा ’50
.
पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शहरात शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. परिस्थिती बदलली, आता वाटाही वाढ हवा मिरा-भाईंदरमधील राजकीय परिस्थिती आता आठ वर्षांपूर्वीसारखी राहिलेली नाही, असे स्पष्ट करत सरनाईक यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरासाठी प्रचंड निधी उपलब्ध झाला असून, गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे युतीत शिवसेनेला बरोबरीचा वाटा आणि योग्य सन्मान मिळणे आवश्यक आहे, असे सरनाईक यांनी यावेळी अधोरेखित केले.
गीता जैन समर्थकांची सेनेत ‘इनकमिंग’
एकीकडे युतीबाबत कठोर भूमिका मांडतानाच दुसरीकडे शिवसेनेने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात माजी आमदार गीता जैन यांच्या खंद्या समर्थकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेविका नयना वसानी, नारायण नंबियार, मिलन भट, प्रमोद दर्जी, संतोष शेट्टी, विजय इंजिनिअर आणि परवाना कुरेशी यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. मिरा-भाईंदरच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून, जनतेशी नाळ असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत असल्याचे मत यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केले.
