I am speaking in Maliwada style…, ‘I saved the city from the British invasion and today I am the one who is becoming an obstacle’ | मी माळीवाडा वेस बोलतेय…: ‘ब्रिटिश आक्रमणापासून अहिल्यानगर शहराला वाचवले अन् आज मीच अडथळा ठरतेय”‎ – Ahilyanagar News



वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे‎कारण पुढे करून शहराचे वैभव‎असलेली माळीवाडा वेस‎हटवण्यासाठी १५ वर्षानंतर पुन्हा‎एकदा खटाटोप सुरू आहे. माळीवाडा‎वेस हटवण्याची मागणी‎महापालिकेकडे करण्यात आली आहे.‎त्यावर मनपाने प्रशासकीय ठराव‎केला. या मागणीवरून‎इतिहासप्रेमीं

.

मी माळीवाडा वेस..ब्रिटिशांनी आक्रमण‎केलं, तेव्हा ज्या वेशीनं अहिल्यानगर‎(तत्कालीन अहमदनगर) शहराचं रक्षण‎केलं, ती मीच! नगरचा त्यावेळचा‎किल्लेदार सर्जेखानने सन १६३१ मध्ये‎शहराभोवती तटबंदी बांधली. मात्र, या‎शहराचा संस्थापक अहमदशाहने सीना‎नदीकाठी जैता दरवाजा बांधल्याचा‎उल्लेख असल्याचे इतिहास अभ्यासक‎सांगतात. तो दरवाजा म्हणजे मीच‎असेल, असे त्याचे मत आहे. पाच‎किलोमीटर लांब, चार मीटर उंच आणि‎दोन मीटर रुंदीच्या तटबंदीला अकरा‎दरवाजे होते. पूर्वेला झेंडा दरवाजा‎(झेंडीगेट) आणि बोवा बंगाल दरवाजा,‎दक्षिणेला माळीवाडा म्हणजे मी आणि‎नंतर इंग्रजांच्या आमदानीत फर्ग्युसन गेट,‎पश्चिमेला नेप्ती आणि नालेगाव वेस,‎उत्तरेला दिल्ली दरवाजा, तोफखाना, ‎‎सर्जेपुरा, मंगळवार (मंगलगेट) आणि‎इंग्रज आमदानीत किंग्जगेट अशी या ‎‎दरवाजांची नावं होती.‎

इंग्रज सेनापती जनरल आर्थर वेलस्ली ‎‎याच्या अधिपत्याखालील सैन्य‎वाळकीमार्गे किल्ल्यावर आक्रमण ‎‎करण्यापूर्वी सन १८०३ मध्ये नगर शहरावर ‎‎माझ्या दरवाजावर समोर धडकलं. तेव्हा ‎‎किल्ला मराठा सरदार महादजी शिंदे यांचे ‎‎दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात ‎‎होता. त्यांच्याकडील अरबी फौजेची एक ‎‎तुकडी शहराच्या तटबंदीवर तैनात होती. ‎‎त्यांच्यात अन् ब्रिटिशांच्या सैन्यात‎घमासान लढाई झाली. अनेक ब्रिटिश ‎‎सैन्यातील अधिकारी व सैनिक मारले‎गेले. त्याची मी साक्षीदार आहे. माझ्या‎जवळच्या वडाच्या झाडाजवळून १ जून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎१९४८ रोजी महाराष्ट्रातील पहिली एसटी‎बस धावली. शहरातील रस्ता रूंदीकरण‎झाले अन् त्यात नऊ दरवाजे नामशेष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎झाले. त्यांची नावं मात्र तुम्ही आजही‎घेताच. म्युनिसिपल बोर्ड असो वा‎नगरपरिषद असो त्यांच्या नगरसेवकांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎माझं अस्तित्व जपलं. पण महापालिका‎झाली अन् काहींना माझी अडचण होऊ‎लागली. माळीवाड्यातील अनेक‎पिढ्यांची मी साक्षीदार आहे. माझं‎अस्तित्व टिकवून त्यांनी या शहराची‎ऐतिहासिक ओळख जपली. मात्र,‎त्यांच्याच वारसदारांना आता मी‎अडथळा ठरतेय. शहर वाढतंय तशी‎वाहनांची संख्या आणि वाहतूक वाढणार‎आहे. त्याचाच विचार करून‎महापालिकेच्या प्रशासक साहेबांनी एकेरी‎वाहतुकीचा प्रस्ताव मांडलाय, हे ऐकून‎आनंद वाटला होता. पण दुसऱ्याच‎दिवशी त्यांनी मलाही हटवायचं ठरवून‎मला पाडायचं की ठेवायचं, अशी‎विचारणा तुम्हा नगरकरांना केल्याचं‎समजलं अन् माझ्या आनंदावर क्षणात‎विरजण पडलं. खरंच माझा अडथळा‎होतोय का, हे आता तुम्हीच ठरवा अन्‎तुमचं म्हणणं प्रशासक साहेबांकडं नक्की‎मांडा..!

यापूर्वीही वेस अन् दिल्ली‎ दरवाजा पाडण्याची तयारी‎

माळीवाडा वेस, दिल्ली दरवाजाला‎पडण्याची तयारी यापूर्वीही झाली होती.‎सन २०१० मध्ये माळीवाडा वेस, तर‎सन २०१८ मध्ये दिल्ली दरवाजावर‎बुलडोझर चालवला जाणार होता.‎इतिहास प्रेमी व सुजाण नागरिकांनी त्या‎बुलडोझरला ब्रेक लावला अन् दोन्ही‎ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा मनसुबा‎धुळीस मिळवला.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *