![]()
वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचेकारण पुढे करून शहराचे वैभवअसलेली माळीवाडा वेसहटवण्यासाठी १५ वर्षानंतर पुन्हाएकदा खटाटोप सुरू आहे. माळीवाडावेस हटवण्याची मागणीमहापालिकेकडे करण्यात आली आहे.त्यावर मनपाने प्रशासकीय ठरावकेला. या मागणीवरूनइतिहासप्रेमीं
.
मी माळीवाडा वेस..ब्रिटिशांनी आक्रमणकेलं, तेव्हा ज्या वेशीनं अहिल्यानगर(तत्कालीन अहमदनगर) शहराचं रक्षणकेलं, ती मीच! नगरचा त्यावेळचाकिल्लेदार सर्जेखानने सन १६३१ मध्येशहराभोवती तटबंदी बांधली. मात्र, याशहराचा संस्थापक अहमदशाहने सीनानदीकाठी जैता दरवाजा बांधल्याचाउल्लेख असल्याचे इतिहास अभ्यासकसांगतात. तो दरवाजा म्हणजे मीचअसेल, असे त्याचे मत आहे. पाचकिलोमीटर लांब, चार मीटर उंच आणिदोन मीटर रुंदीच्या तटबंदीला अकरादरवाजे होते. पूर्वेला झेंडा दरवाजा(झेंडीगेट) आणि बोवा बंगाल दरवाजा,दक्षिणेला माळीवाडा म्हणजे मी आणिनंतर इंग्रजांच्या आमदानीत फर्ग्युसन गेट,पश्चिमेला नेप्ती आणि नालेगाव वेस,उत्तरेला दिल्ली दरवाजा, तोफखाना, सर्जेपुरा, मंगळवार (मंगलगेट) आणिइंग्रज आमदानीत किंग्जगेट अशी या दरवाजांची नावं होती.
इंग्रज सेनापती जनरल आर्थर वेलस्ली याच्या अधिपत्याखालील सैन्यवाळकीमार्गे किल्ल्यावर आक्रमण करण्यापूर्वी सन १८०३ मध्ये नगर शहरावर माझ्या दरवाजावर समोर धडकलं. तेव्हा किल्ला मराठा सरदार महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात होता. त्यांच्याकडील अरबी फौजेची एक तुकडी शहराच्या तटबंदीवर तैनात होती. त्यांच्यात अन् ब्रिटिशांच्या सैन्यातघमासान लढाई झाली. अनेक ब्रिटिश सैन्यातील अधिकारी व सैनिक मारलेगेले. त्याची मी साक्षीदार आहे. माझ्याजवळच्या वडाच्या झाडाजवळून १ जून१९४८ रोजी महाराष्ट्रातील पहिली एसटीबस धावली. शहरातील रस्ता रूंदीकरणझाले अन् त्यात नऊ दरवाजे नामशेषझाले. त्यांची नावं मात्र तुम्ही आजहीघेताच. म्युनिसिपल बोर्ड असो वानगरपरिषद असो त्यांच्या नगरसेवकांनीमाझं अस्तित्व जपलं. पण महापालिकाझाली अन् काहींना माझी अडचण होऊलागली. माळीवाड्यातील अनेकपिढ्यांची मी साक्षीदार आहे. माझंअस्तित्व टिकवून त्यांनी या शहराचीऐतिहासिक ओळख जपली. मात्र,त्यांच्याच वारसदारांना आता मीअडथळा ठरतेय. शहर वाढतंय तशीवाहनांची संख्या आणि वाहतूक वाढणारआहे. त्याचाच विचार करूनमहापालिकेच्या प्रशासक साहेबांनी एकेरीवाहतुकीचा प्रस्ताव मांडलाय, हे ऐकूनआनंद वाटला होता. पण दुसऱ्याचदिवशी त्यांनी मलाही हटवायचं ठरवूनमला पाडायचं की ठेवायचं, अशीविचारणा तुम्हा नगरकरांना केल्याचंसमजलं अन् माझ्या आनंदावर क्षणातविरजण पडलं. खरंच माझा अडथळाहोतोय का, हे आता तुम्हीच ठरवा अन्तुमचं म्हणणं प्रशासक साहेबांकडं नक्कीमांडा..!
यापूर्वीही वेस अन् दिल्ली दरवाजा पाडण्याची तयारी
माळीवाडा वेस, दिल्ली दरवाजालापडण्याची तयारी यापूर्वीही झाली होती.सन २०१० मध्ये माळीवाडा वेस, तरसन २०१८ मध्ये दिल्ली दरवाजावरबुलडोझर चालवला जाणार होता.इतिहास प्रेमी व सुजाण नागरिकांनी त्याबुलडोझरला ब्रेक लावला अन् दोन्हीऐतिहासिक वास्तू पाडण्याचा मनसुबाधुळीस मिळवला.
