![]()
पुण्यातील सारथी संस्थेच्या एका कार्यक्रमात भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शेजारी रिकाम्या खुर्चीवर बसणे आणि कथित विधानावरून जोरदार वाद झाला. त्यामुळे कुलकर्णी कार्यक्रमातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी सांगितले की, आमदार पवार मला म्हणाले “मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणे शोभत नाही, तुम्ही दुसऱ्या रांगेत बसा.’ त्यावर पवार म्हणाले की, ‘एकच खुर्ची रिकामी असल्याने मी अशी विनंती केली होती. यात कोणताही जातीय किंवा वादाचा हेतू नव्हता.’ सारथी संस्थेच्या वतीने लोकसेवा आयोग (यूपीएससी आणि एमपीएससी) परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे शुक्रवारी करण्यात आले होते. तेथे हा प्रकार घडला. खा. कुलकर्णी यांची या पूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी तसेच भाजपच्या एका नेत्याशी वादावादी झाली होती. तेव्हा काही ज्येष्ठांनी त्यांची समजूत घातली होती. आताही या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करून वादावर पांघरुण घालावे लागणार आहे. अशा वादातून समाजाला काय संदेश देणार- पाटील नरेंद्र पाटील म्हणाले की, ब्राह्मण मराठा वादाची कोणती घटना घडलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्या आतापर्यंत कोणत्याही नेत्यांनी केलेल्या नाही. त्यामुळे अशाप्रकारचे वाद करून आपण समाजाला काय संदेश देणार आहोत. विनंती केली होती, जातीय हेतू नव्हता : अभिमन्यू पवार आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, पुढे एकच खुर्ची रिकामी असल्याने त्यावर नरेंद्र पाटील बसतील आणि आपण दोघे मागे बसू, असे मी त्यांना विनंतीवजा सुचवले होते. यात कोणताही जातीय किंवा वादाचा हेतू नव्हता. पहिल्या रांगेत बसण्यासाठी पवारांची धडपड : कुलकर्णी खा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “जातीय टिप्पणीमुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पहिल्या रांगेत बसण्यासाठी पवारांची धडपड सुरू होती. कार्यक्रमात एखाद्या जातीचा विषय कुठून आला हे समजत नाही.’
महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राजवळ कोण… मराठा की ब्राह्मण?:पुण्यातील कार्यक्रमात भाजप आमदार पवार, खासदार मेधा कुलकर्णींत वाद
