गोवंश कत्तलीवर बंदी घालावी:सकल हिंदू समाजाची तहसीलदारांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन

0
9d9202a4-0e0b-4a12-9430-1f3d7eeaa084_1777479550085.jpg




तिवसा येथे सकल हिंदू समाजाने गोवंश कत्तलीवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी बुधवारी, २९ एप्रिल रोजी शहरातून ‘गोमाता सन्मान जनजागृती मिरवणूक’ काढण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींनाही या मागणीचे निवेदन पाठवण्यात आले. राज्यात गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कठोर कायदा तयार करण्याची मागणी समाजाने केली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारशात गायींचे महत्त्व अनमोल आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या भूमीत गायींचा आदर आणि सेवा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सध्या दहा लोकांमागे एक गाय अशी चिंताजनक परिस्थिती असून, देशी जनावरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गायींची तस्करी, कत्तलखान्यात होणारी निर्दयी कत्तल, रस्त्यांवरील अपघात आणि शहरी भागातील पॉलिथिनच्या वापरामुळे दररोज मोठ्या संख्येने गायींचा मृत्यू होत आहे. या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून, महाराष्ट्रातील गोवंशाच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला राज्यघटनेच्या कलम ४८ मध्ये आवश्यक सुधारणा करून ‘केंद्रीय गाय सेवा आणि संरक्षण कायदा’ लागू करण्याची विनंती केली आहे. हा कायदा तातडीने लागू करून गोवंशाचे संवर्धन व्हावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed