बारावीचे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे दोन पेपर फुटल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित ठेव
.
नागपूर येथील एका परीक्षा केंद्रावर बारावीचे फिजिक्स व केमेस्ट्री हे दोन पेपर फुटले होते. यामुळे परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात घेण्याच्या बोर्डाच्या तयारीचा फज्जा उडाला होता. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ माजली असताना आता बोर्डाने असे प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हींच्या बाबतीत अधिक कठोर निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या निर्णयानुसार, दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. तसेच हे सीसीटीव्ही बमंद असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित केंद्रप्रमुख, प्राचार्य व समन्वयक यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
विशेषतः सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या फुटेजमध्ये काही गडबड किंवा छेडछाड आढळल्यास संबंधित केंद्र संचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी वर्गखोल्यांत केवळ कॅमेरे लावून चालणार नाही. तर परीक्षा कालावधीत होणाऱ्या सर्व घडामोडींचे सातत्याने व अखंडित रेकॉर्डिंग होणे अत्यावश्यक आहे, असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्र व शाळांना दिले आहेत.
काय घडले होते नागपुरात?
नागपूर येथील एका परीक्षा केंद्रावर 18 फेब्रुवारी रोजी केमेस्ट्रीचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला होता. येथील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. ही विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात होती. त्यामुळे पर्यवेक्षकांना तिचा संशय आला होता. त्यानंतर तिची झडती घेतली असता तिच्याकडे एक स्मार्टफोन आढळला. त्या फोनमधील व्हॉट्सएप ग्रुपमध्ये फिजिक्स विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पोहोचल्याचे आढळले होते. त्यानंतर पर्यवेक्षकांनी सदर विद्यार्थीनाचा स्मार्टफोन जप्त करून पुढील कारवाई केली होती.
याच प्रकरणाच्या चौकशीत 16 फेब्रुवारी रोजी झालेला फिजिक्सचा पेपरही असाच फुटल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी खासगी क्लासच्या संचालकांसह दोघांना अटक केली आहे. निशिकांत मून व फरहान अशी या आरोपींची नावे आहेत.
हे ही वाचा…
मराठी रंगभूमीवर हाऊसफुलचा बोर्ड झळकू दे:राज ठाकरे यांनी व्यक्त केली सदिच्छा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही कवी विठ्ठल वाघांची घेतली भेट

राजकारणी जर व्यासंगी असेल, तर त्याच्या सभोवतालचे कला आणि साहित्य क्षेत्रही बहरते. मात्र सध्याच्या राजकारणात हा व्यासंगीपणा दुर्मीळ होत चालल्याचे चित्र आहे. पण राज ठाकरे हे एक ठळक अपवाद ठरतात. ते सत्ताधाऱ्यांवर जसे तिखट शब्दांचे फटकारे मारतात, तसेच व्यंगचित्रांच्या रेषांमधूनही ते आपली भूमिका प्रभावीपणे मांडतात. याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा आली. निमित्त होते ‘सुख पाहता’ या नाटकाच्या पुस्तकाचे. आपल्या वैयक्तिक ग्रंथसंपदेत हे पुस्तक सापडल्यानंतर राज ठाकरे जुन्या आठवणींत रमले. मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा फलक सतत झळकत राहो आणि नाट्यानुभवासोबतच नाटकांची पुस्तकेही झपाटून वाचली जाण्याचा काळ पुन्हा यावा, अशी त्यांनी मनापासून सदिच्छा व्यक्त केली. वाचा सविस्तर
