![]()
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. सकाळपासून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केल्याने अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी झाली होती. सातारा जिह्यात भाजपाने तब्बल 60 ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरले असून पंचायत समितीसाठी 118 ठिकाणी अर्ज भरले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे नेते एबी फॉर्म वाटून चक्क आजारी पडल्याने माहिती समजू शकली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 18 जिल्हा परिषद गट आणि 26 गणात उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजितदादा गटानेही अर्ज मोठया संख्येने भरलेले आहेत. त्यांची आकडेवारी समजू शकली नाही. दरम्यान, अर्ज छाननी दि. 22 रोजी असून दि. 23 ते 27 दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने त्या दरम्यान निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सातारा आणि जावली तालुक्यात भाजपाचे एबी फॉर्म म्हसवे गटातून वसंतराव मानकुमरे, कुडाळ गटातून जयश्री गिरी, कुसूंबी गटातून अर्चना रांजणे, पाटखळ गटातून अॅङ गौरी नलावडे, लिंब गटातून सर्जेराव सावंत, खेड गटातून संदीप शिंदे, कोडोली गटातून निता बाळासाहेब खरात, कारी गटातून राजू भोसले, शेंद्रे गटातून पूजा मोरे, वर्णे गटातून वैभव चव्हाण, नागठाणे गटातून अजित साळुंखे तर गणासाठी खर्शी बारामुरेतून गोरखनाथ महाडिक, म्हसवेतून रेश्मा पोफळे, कुडाळमधून सौरभ शिंदे, सायगावमधून चारुशिला पवार, आंबेघर तर्फ मेढामधून विजय सपकाळ, कुसुंबीतून पुष्पा चिकणे, शिवथरमधून किशोर शिंदे, पाटखळमधून राहुल शिंदे, लिंबमधून प्रभाकर पवार, कोंडवेतून महेश गाडे, खेडमधून मधू कांबळे, क्षेत्र माहुलीतून स्वाती जाधव, कोडोलीतून रामदास साळूंखे, संभाजीनगरमधून विजया साळूंखे, परळीतून वसंतराव भंडारे, कारीतून शोभा लोटेकर, निनाम मधून प्रमिला सुतार, शेंद्रेतुन कोमल दळवी, वर्णेतुन साक्षी माने, अपशिंगेतून मानसिंग मोरे, नागठाणेतून राजेंद्र ढाणे, अतितमधून सुषमा जाधव यांना तिकीट दिले असून त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे.
साताऱ्यात भाजपाचा 'एल्गार':जिल्हा परिषदेच्या 60 तर पंचायत समितीच्या 118 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल
