![]()
ओडिशा, तेलंगणातून महाराष्ट्रात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त केले आहे. खारेगाव टोलनाक्यावर पोलिसांनी कारमधून ६३८ किलो गांजा जप्त केला असून, या कारवाईत २ कोटी १४ लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस
.
मालमत्ता कक्षाचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना एका कारमधून गांजा ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खारेगाव टोलनाक्याजवळ संशयास्पद कार (क्र. एपी ०९ बीएफ-९३८२) येताच झडती घेतली असता गांजा साठवून ठेवल्याचे आढळून आले. कारवाईत पोलिसांनी चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (वय ३६, रा. मेहबूबनगर, तेलंगणा) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ कोटी ४ लाख १६ हजाराचा ६३८ किलो गांजा व १० लाख किमतीची कार, असा एकूण २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
