![]()
माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी ‘आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि ऋषिकेश जैस्वाल हेच पक्ष चालवत असून, पक्षात सन्मान नसेल तर आम्हाला पदमुक्त करा,’ अशी तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या वादा
.
याबाबत पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले की, तनवाणी यांनी काही आक्षेप नोंदवले होते. निवडणुकीत सर्वांना सोबत घेत काम करायचे आहे. त्यामुळे समन्वय समिती एकत्र राहून युतीची बोलणी करणार आहे. गुरुवारी आमची भाजपसोबत पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत मी आणि भाजपकडून अतुल सावे हेदेखील बैठकीत सहभागी होणार आहेत.
आता तनवाणी समर्थकांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे
तनवाणी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. मुख्य समन्वय समितीत ते सहभागी होणार असल्यामुळे युतीच्या चर्चेतही महत्त्वाची भूमिका असेल. यापूर्वी अनेक निवडणुका त्यांनी हाताळल्या असल्यामुळे त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे. विशेषत: तनवाणी यांच्यासोबत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्या समर्थकांना आता उमेदवारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
