![]()
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक तिढा सुटल्याचे चित्र आहे. या बैठकीत “ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यम
.
मुंबई आणि प्रमुख शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रितपणे महानगपालिकांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आजच्या बैठकीत ‘विद्यमान तिथेच’ या तत्त्वावर सहमती झाली असली तरी, काही विशिष्ट जागांवर विजयाची गणिते जुळवण्यासाठी जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष लावून काही जागांवर फेरबदल केले जातील, असे समजते.
महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी ‘मॅरेथॉन’ बैठक
जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आणि सूक्ष्म नियोजन करण्यासाठी येत्या गुरुवारी पुन्हा एकदा महायुतीची ‘मॅरेथॉन बैठक’ पार पडणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत प्रभागनिहाय चर्चा करून उमेदवारांची चाचपणी केली जाईल. ज्या जागांवर पेच निर्माण होईल किंवा एकमत होणार नाही, त्या जागांचा निर्णय स्थानिक पातळीवर न घेता, तो थेट भाजप आणि शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडे सोपवला जाईल, असेही या बैठकीत ठरले आहे.
प्रतिमा मलिन होऊ देऊ नका
जागावाटपावरून होणारे वाद चव्हाट्यावर आल्यास त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो, याची जाणीव महायुतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. त्यामुळे “जागावाटपाच्या प्रक्रियेत कोणताही अंतर्गत वाद बाहेर जाऊ देऊ नका आणि महायुतीची प्रतिमा मलिन होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्या,” अशा सक्त सूचना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे यंदाची चर्चा अत्यंत गोपनीय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसून येत आहे.
भाजपचा राष्ट्रवादीसोबत जाण्यास नकार
दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेना व भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, होय आमचे ठरले. आमचा फॉर्म्युलाही ठरला. आमचा आकडाही ठरला. महायुतीच्या मुंबईत 150 प्लस जागा निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आहे. शिवसेना, भाजप व रिपाइंसह कुणी कुठे लढल्यावर 150 प्लस जागा निवडून येतील, तो आकडा ठरवण्याच्या अभ्यासासाठी आज बैठक झाली. या प्रकरणी 1-2 दिवसांत पुन्हा एकत्र बसून दोन्ही पक्ष किती जागा लढवतील हे ठरवले जाईल.
नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आले आहेत. त्यामुळे आम्ही अशा राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही. शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष आम्हाला भेटले. त्यांनाही आम्ही हेच सांगितले आहे, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.
