![]()
प्रा. राजेश लेहकपुरे यांच्या ‘विकसित भारत आणि जनसंपर्क’ या पुस्तकाचे आज, रविवारी देहरादून येथे प्रकाशन झाले. वर्धा येथील म. गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात कार्यरत असलेले प्रा. लेहकपुरे हे मूळचे अमरावतीचे रहिवासी आहेत. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑ
.
प्रा. लेहकपुरे हे पीआरएसआयच्या वर्धा चॅप्टरचे अध्यक्ष आहेत. या पुस्तकाच्या संपादनात त्यांना सचिव बी. एस. मिरगे यांचे सहकार्य लाभले आहे. पीआरएसआयच्या कोणत्याही चॅप्टरकडून प्रकाशित झालेले हे पहिलेच पुस्तक आहे.
देहरादून येथे १३ ते १५ डिसेंबर दरम्यान पीआरएसआयची ४७ वी परिषद सुरू आहे. ‘विकसित भारत २०४७ : इमर्जिंग ग्रोथ, प्रिझर्व्हिंग रूट्स’ हा या परिषदेचा विषय आहे. या परिषदेत रविवार, १४ डिसेंबर रोजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पीआरएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत पाठक, मॉस्को येथील एकोसचे डेप्युटी चेअरमन डॉ. मिशेल मास्लोव उपस्थित होते. तसेच पीआरएसआय पूर्व विभागाच्या उपाध्यक्षा अनु मुजुमदार आणि पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष एस. पी. सिंह यांचीही उपस्थिती होती.
या पुस्तकात शिक्षण, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), शेती, चित्रपटसृष्टी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, पर्यावरण, वन्यजीव, माध्यमे, राजकारण, आपत्ती व्यवस्थापन, जनसंपर्कातील नैतिक मूल्ये, कॉफी टेबल बुक व जनसंपर्क, सोशल मीडिया, शासकीय जनसंपर्क अशा विविध विषयांवर तज्ज्ञ विद्वानांचे लेख समाविष्ट आहेत. पीआरएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत पाठक यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.
या परिषदेला देश-विदेशातील जनसंपर्क अधिकारी, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे संपादक, पत्रकार, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर, जाहिरात व्यवस्थापक, माध्यमतज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित आहेत.
