Ahilyanagar: Work Begins on Two Flyovers in Nagapur, Completion Planned by October | अहिल्यानगरच्या नागापुरात 2 उड्डाणपुलांचे काम सुरू;‎ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची तयारी – Ahilyanagar News

उद्योजकांसह कामगारांसाठी महत्त्वाचे चौक असलेल्या‎व सर्वाधिक रहदारी असलेल्या सन फार्मा चौक व‎ सह्याद्री चौक येथे दोन उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम‎ सुरू झाले आहे. गेल्या सहा दिवसांत या‎ उड्डाणपुलासाठी तीन ‘पिलर’ उभारले आहेत. तीन‎ पदरी हे दोन उड्डाणपुलाच

.

ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात नगर-मनमाड रस्त्याहून ‎शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दोन चौकातील वाहतूक‎ कोंडीत न अडकता थेट जाता येणार आहे. या दोन ‎चौकात उड्डाणपुल झाल्यानंतर या मार्गावरून‎ जाणाऱ्यांचा 32 मिनिटांचा वेळ वाचेल. नागापूर‎ औद्योगिक वसाहतीतील सह्याद्री चौक व सन फार्मा या‎चौकात कामगार कामावरून निघत असल्यामुळे ‎सकाळी 8.30 ते सकाळी 11.30 वाजेपर्यंत व‎सायंकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ‎वाहतूक सुरू असते. यातील सन फार्मा या चौकातून‎ निंबळक रस्ता जातो, याच रस्त्यावर मोठे उद्योग आहेत.‎सहाद्री चौकातून औद्योगिक वसाहतीत जात असलेल्या ‎रस्त्यावर बँका, उद्योग, एमआयडीसीचे कार्यालय,‎ महावितरण मुख्य स्टेशन आहे. त्यामुळे दोन्ही चौकात ‎सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.‎

या उड्डाणपुलांसाठी निविदा प्रसिद्ध करून 15 ‎ऑक्टोबर 2024 ला कार्यारंभ आदेशदेखील काढला‎ होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी 3 ऑगस्टला ‎या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन डीएसपी चौक ‎येथून केले होते.‎

39 कोटीतून 3 पदरी 2 उड्डाणपूल‎

सह्याद्री व सन फार्मा चौकातून औद्योगिक वसाहतीत कामगांराबरोबरच ‎मोठ्या कंटेनरची वाहतूक होते. या दोन्ही चौकांमध्ये तीन पदरी उड्डाणपूल‎ होणार आहेत. दोन उड्डाणपुलासाठी 39 कोटी 36 लाखांचा खर्च होणार आहे.‎ विशेष म्हणजे या दोन उड्डाणपुलाचे कॉस्टींग जागेवरच न करता दुसरीकडे‎ कॉस्टिंग केले जाईल. खांब तयार करून तेथे क्रेनच्या सहाय्याने जोडले‎ जाणार आहेत. त्यामुळे काम सुरु असताना होणारी वाहतूक कोंडी कमी ‎होणार आहे.‎

“डीएसपी’ चौकातील‎ उड्डाणपुलाला ब्रेक‎

वर्दळीचे ठिकाण असलेल्या‎ डीएसपी चौक व पुढे कोठला‎ चौकात सातत्याने वाहतूक ‎कोंडी होते. डीएसपी चौकात‎ उड्डाणपूल झाल्यानंतर‎ प्रवाशांना थेट जाता येणे शक्य होणार होते. मात्र ‎डीसपी चौकातील ‎उड्डाणपुलाच्या कामाला मात्र‎ ब्रेक लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर‎ पालकमंत्र्यांनी या कामाचे ‎भूमिपूजन केले, मात्र या‎ उड्डाणपुलाबाबत मात्र सध्या‎”जैसे थे” परिस्थिती आहे.‎त्याला काही राजकीय ‎कांगोरे दिले जात आहे. ‎राजकीय श्रेयवादातून या‎ उड्डाणपुलाला ब्रेक‎ लागल्याचे राजकीय वर्तुळात ‎बोलले जात आहे.‎

थेट सवाल‎ विनायक पाटील, उपअभियंता ‎बांधकाम विभाग‎ 32 मिनिटांचा वेळ वाचेल‎

Q : दोन उड्डाणपुलाचे काम कधीपर्यंत‎ होईल?‎

A : ऑक्टोबरपर्यंत हे दोन्ही‎उड्डाणपुल होतील.‎

Q : पहिल्या टप्प्यात काय काम‎ होईल?‎

A : लोखंडी पिलर टाकल्यानंतर‎ कॉस्टिंग केले जाईल.‎

Q : उड्डाणपुलाचे काय फायदे‎होतील?‎

A- दोन उड्डाणपुलामुळे प्रवाशांचे‎ 32 मिनिटे वाचतील.‎‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *