मनोज जरांगेंच्या लाडाखातर दोन बेकायदेशीर आरक्षणे सुरू:उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची टीका

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-28t174454439_1779972073.jpg




मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उर्वरित मागण्या सरकारकडून अद्याप मान्य झालेल्या नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र काढले आहे. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच अनाथांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद करत मनोज जरांगे यांच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण सुरू असल्याची टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, माझ्याकडे अनाथ मुलं जी म्हणजे जे आई वडील गेल्यामुळे अनाथ झाले आणि जी मुलं ज्यांना आई-वडीलच माहीत नाही, अशा लोकांनी मला निवेदन पाठवले आहे. देशात इतरत्र एक टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिले जात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे तेलंगण असेल. तर मला असे वाटते की हा खरा घटक आहे की ज्यांना आरक्षणाची गरज आहे. म्हणजे एक टक्का आरक्षण असेल तर काय होत आहे, 100 जागा असतील तर त्यांच्या वाट्याला जागाच येत नाही. अनाथांच्या बाबतीत सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे अनाथांचे आरक्षण 1 टक्क्यापेक्षा जास्त वाढले पाहिजे. जरांगेच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण पुढे बोलताना मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आणि त्यांनी मागीतलेल्या आरक्षणावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे यांनी जे आरक्षण मागितले आहे, म्हणजे त्याच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन दोन आरक्षण सुरू आहेत, त्यावर व्हाइट पेपर पब्लिश करा. येणाऱ्या आधिवेशनात पब्लिश करा. एसीबीसी म्हणून किती लाभ झाले आहेत नोकऱ्यांमध्ये, महाविद्यालयांमध्ये- एमबीबीएस, बीडीएस, अभियांत्रिकीला आणि कुणबी मराठा म्हणून किती प्रवेश झाले आहेत आणि किती लाभ झाले आहेत. ही जिम्मेदारी आहे सरकारची. अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या. या अनाथांसाठी कोणाचे नेतृत्व नसणार मला माहीत आहे या अनाथांसाठी कोणाचे नेतृत्व नसणार आहे. परंतु, माझी हात जोडून विनंती आहे, या अनाथांना 100 जागा नसतात म्हणून एक टक्का आरक्षण मिळत नाही. कारण रोस्टरला एक जागा येण्यासाठी 100 जागा असाव्या लागतात. या अनाथांचा नाथ कोणीतरी बनले पाहिजे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अनाथांना त्यांच्या आरक्षणात वाढ झाली पाहिजे. या आरक्षणाला कोणाचाच विरोध असणार नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. उन्हात बसतो.. उन्हात बसतो, मरतो मरतो मरतो मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, खिलाडी पुराना हें, मगर रील नया हे. मनोज जरांगे, पोलिटिकल इन्फ्लुएन्सर. जेव्हा राजकारणी डाउनफॉलला असतात तेव्हा ते मनोज जरांगेकडे जातात. आज आपणाला हे बोलत असताना मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. ते म्हणाले, उन्हात बसतो.. उन्हात बसतो, मरतो मरतो मरतो, अरे उन्हात बसतो.. उन्हात बसतो, मरतो मरतो मरतो.. बाजावर बसतो बाजावर बसतो, छातीत धडकी घेऊन बसतो.. आता मरतो, आता मरतो, आता मरतो.., अशी कविता सदवार्ते यांनी सादर केली. मनोज जरांगे अशा प्रकारे स्वतःच्या प्रकृतीवर घाला घालून घेत असतील आणि ही व्यक्ती भावनिक, एक हिंदी म्हण आहे, भावनिक वातावरण तयार करून गौरण घालत आहेत, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed