![]()
बाहेरचे फास्ट फूड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये घडली आहे. येथील एका नामांकित फूड आउटलेटमधून शोरमा आणि पिझ्झा खाणे अनेक कुटुंबांना चांगलेच महागात पडले. पिझ्झा खाल्ल्यानंतर काही तासांतच लहान मुलांसह तब्बल 37 जणांना फूड पॉयझनिंग झाली असून, त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्याच दिवशी सुरू झाला त्रासाचा फेरा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व नागरिकांनी बुधवारी रात्री आउटलेटमधून पिझ्झा विकत घेऊन खाल्ला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारपासूनच त्यांना पोटदुखी, उलट्या, चक्कर आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. गुरुवारी सायंकाळपासून रुग्णांना रुग्णालयात आणण्याचा सुरू झालेला हा सिलसिला थेट शुक्रवार सकाळपर्यंत सुरूच होता. सुदैवाने, सर्व रुग्णांवर वेळेत उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पिझ्झाचे नमुने जप्त; पोलिसांची कारवाई
या खळबळजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित फूड आउटलेटच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अन्नबाधा नेमकी कशामुळे झाली, हे शोधण्यासाठी आरोग्य विभागाने पिझ्झाचे नमुने जप्त करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हे ही वाचा.. आमदार निवासात पाण्याची टंचाई: कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सविस्तर वाचा
भिवंडीत शोरमा-पिझ्झातून फूड पॉयझनिंग:लहान मुलांसह 37 जणांची प्रकृती बिघडली, फूड आउटलेट मालकावर गुन्हा
