Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate Meets Ajit Pawar Amid Rummy Video Controversy | माणिकराव कोकाटे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला: मंत्रिपदावर काय निर्णय होणार? राजीनामा घेतला जाणार की खाते बदलणार? – Mumbai News

Advertisements
Advertisements



महाराष्ट्राचे कृषिमंत्री व अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे मोबाइलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झा

Advertisements

.

विधिमंडळात रम्मीचा डाव

राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला अनेक मुद्यांवरून कोंडीत पकडल्याचे पाहायला मिळाले. त्यात भर पडली ती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळतानाच्या व्हिडिओची. त्यांचा मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून रमी खेळत बसणारा कृषिमंत्री नको, असे म्हणत विरोधकांनी कडाडून विरोध केला. याचे पडसाद बाहेरही पाहायला मिळाले. अनेक शेतकरी संघटनांनी देखील कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त विधान

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तर सरकारला उद्देशून आहे, असे सांगताना पुन्हा चूक केली आणि शेतकरी भिकारी नाही, तर सरकार भिकारी आहे, वादग्रस्त विधान केले. कांदा काढल्यानंतर आता काय ढेकळांचा पंचनामा करायचा का? आणि पीक विम्याची रक्कम घेऊन तुम्ही मुला, मुलींची लग्ने, साखरपुडा करता. ती रक्कम शेतीत गुंतवत नाही, अशी वादग्रस्त विधाने माणिकराव कोकाटे यांनी केली आहेत.

Advertisements
  • Related Posts

    Shivsena Protest Shivaji Nagar Underpass Water Leak | शिवाजीनगर भुयारी मार्गात पाणी गळती: शिवसेना ठाकरे गटाचे ‘आठवा अजूबा’ आंदोलन, पालकमंत्र्याच्या दबावापोटी घाईत उद्घाटन केल्याचा आरोप – Chhatrapati Sambhajinagar News

    छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी जोरदार आठवा अजूबा आंदोलन करण्यात आले. महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तर…

    Raj Thackeray Proposes Concrete Plan to Solve Mumbai’s Traffic and Parking Problems | अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना आवाहन- माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा! – Mumbai News

    अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *