सुप्रिया सुळे व्होट जिहादमुळे खासदार झाल्या:मंत्री नीतेश राणे यांचा दावा; सुळेंची भूमिका लव्ह जिहादला पोषक असल्याचाही आरोप

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-22t15_1776852599.png




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या व्होट जिहादच्या माध्यमातून खासदार झाल्याचा दावा भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या फतवे काढून खासदार झाल्यात. त्या व्होट जिहादच्या माध्यमातून निवडून आल्यात. त्यामुळे त्यांच्यासारख्या मानसिकतेचे लोक या देशात महिलांना अधिकार मिळू देणार नाहीत, असे त्या म्हणाल्यात. राज्यात सध्या महिला आरक्षणाशी संबंधित सीमांकन विधेयकाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. सत्ताधारी भाजपने या प्रकरणी विरोधकांवर विशेषतः काँग्रेसवर महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगला असताना मंत्री नीतेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर उपरोक्त आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांची भूमिका लव्ह जिहादच्या समर्थनाची आहे. तुम्ही त्यांचे यासंबंधीचे व्हिडिओही असंख्यवेळा पाहिले. त्या केवळ फतवे काढून खासदार झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या कोणकोणत्या मस्जिदींत गेल्या व तेथून फतवे काढून त्या खासदार झाल्या हे सर्वांनी पाहिले. त्या केवळ व्होट जिहादच्या निमित्ताने निवडून आल्या. त्यामुळे या मानसिकतेचे लोक हिंदू राष्ट्रात किंवा या राष्ट्रात महिलांना अधिकार मिळू देणार नाहीत हे स्पष्ट आहे, असे नीतेश राणे यांनी म्हटले आहे. मी गोल टोपी व दाढीवाल्यांमुळे आमदार झालो नाही उल्लेखनीय बाब म्हणेज नीतेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी आपण गोल टोपी किंवा दाढीवाल्यांमुळे आमदार झालो नसल्याचेही वादग्रस्त विधान केले होते. ते मुंब्रा येथील एका कार्यक्रमात म्हणाले होते, मी छाती ठोकून सांगतो की, मी कोणत्याही गोल टोपी व दाढीवाल्यांमुळे आमदार झालो नाही. मी हिंदू समाजाने मला निवडून दिल्यामुळे आमदार झालो. त्यामुळे कुणीही हिंदूंनाी धमकावू किंवा भीती घालू नका. तुम्ही आमचा तिसरा डोळा उघडला, तर शुक्रवारी तुमचा सिलिंडरही वर येणार नाही एवढी दक्षता बाळगा. चांगल्या पद्धतीने सावधगिरी बाळगा. कारण, या हिंदू राष्ट्रात हिंदू समाजाने आशीर्वाद देऊन आम्हाला इथे बसवले आहे. मी मंत्रालयात बसतो किंवा इथे आलो ते एक आमदार किंवा मंत्री म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी व तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. आम्हाला मतांची काळजी नाही. त्यांची 5 मते कमी झाली, तर हिंदू समाजाची 50 मते आम्हाला मिळतील. त्यामुळे त्याची चिंता करू नका. हिंदू समाजाची ताकद काय आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे. मुंब्रा कुणाच्या वडिलांची जहागीर नाही. इथे आमची मुंब्रा देवी आहे. हिंदूंच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, असेही नीतेश राणे यावेळी बोलताना म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed