![]()
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुंबई येथून सकाळी बारामती येथे अजित पवार विमानाने आले. बारामतीत विमान लँड करत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण बारामतीमध्ये सध्या शुकशुकाट असून काटेवाडी गावात कुठल्याच घरात चूल पेटली नसल्याचे समोर आले आहे. तसेच काटेवाडी या गावात एक लग्न समारंभ होणार होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. अजित पवारांना बारामती भागातून मानणारा एक मोठा वर्ग आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. गावातील फोटो पाहा
बारामतीत शुकशुकाट!:अजित पवारांच्या निधनामुळे काटेवाडीत पेटली नाही चूल, संपूर्ण गाव शांत; पाहा PHOTO
