![]()
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. मुंबईवरून बारामती येथे येत असताना बारामती विमानतळावार लँडिंगच्यावेळीच अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मुंबई येथून बारामती येथे येत असताना बारामती विमानतळावर लॅंडींग करत असतानाच विमानाला भीषण अपघात झाला आणि यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघातानंतर आता हे विमान ज्या कंपनीचे आहे, त्या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लॅंडींग करायला अवघे काही मिनिट शिल्लक असताना हा अपघात झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यावर वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी ट्विट करत VSR कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. सुहेल सेठ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान VSR Aviation च्या मालकीचे होते. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे हे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. पिता-पुत्र ही कंपनी चालवतात. ते लोकांना DGCAIndia हे आमच्या खिशात आहे असे लोकांना सांगत फिरत असतात. ही चार्टर कंपनी बंद केली पाहिजे, असे सेठ यांनी म्हटले आहे. सुहेल सेठ यांच्यानंतर तेहसीन पुनावाला यांनी देखील ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते. ते विमान VSR Aviation चे होते. हे त्या कंपनीचे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. DGCA ने आता तरी यात लक्ष घालून कडक पावलं उचालावीत. ओम शांती! दरम्यान, या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजित पवार, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. 2023 सालीही झाला होता असाच अपघात 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL हे खासगी विमान कोसळले होते. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. या अपघातात प्रवास करणाऱ्यांपैकी तीन जण जखमी झाले होते. हा अपघात देखील लॅंडींग करत असताना काही मिनिटे पूर्वीच झाला होता. या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडेच झाले होते. दरम्यान, अजित पवार देखील याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. हा अपघात देखील लॅंडींग करण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी झाला आहे. यावरून पत्रकार सुहेल सेठ यांनी या कंपनीवर बोट ठेवले आहे. तसेच या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू:VSR Aviation कंपनीवर गंभीर आरोप, या कंपनीचे हे दुसरे विमान क्रॅश झाल्याचा दावा
