![]()
मेळघाटातील आदिवासींनी रस्ते दुरुस्तीसह सुमारे २० गावांमधील समस्या सोडवण्यासाठी अमरावतीकडे सुरू केलेली ९० किलोमीटरची पायदळ वारी स्थगित करण्यात आली आहे. अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी (एसडीओ) हस्तक्षेप करत १९ जानेवारीनंतर संयुक्त बैठक घेण्याचे आश्वा
.
टेब्रुसोंडा ते परसापूर आणि घोंगडा ते धामणगाव गढी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलकांनी मेळघाटातून आपली पायदळ वारी सुरू केली आणि पहिल्या दिवशी बोराळा येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी अचलपूरच्या एसडीओंनी आंदोलकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या कार्यालयात बोलावले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सध्या सर्व अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचे एसडीओनी स्पष्ट केले. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांनी १९ ते २३ जानेवारी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आदिवासींनी आपली पायदळ वारी थांबवली.
या आंदोलनात रामबाबू दहिकर, धरमडोहचे सामाजिक कार्यकर्ते सागर बेलसरे, टेंब्रुसोंडा येथील सोमेश दुर्गे व ज्ञानेश्वर वायकर, चांदपूर येथील राजेश कास्देकर, ओंकार सावलकर व लालाजी दहिकर यांच्यासह इतर अनेक गावांमधील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
