Maharashtra Language Culture Decline Vishwas Patil Criticism Marathi Literature Conference | भाषा, संस्कृती, ऐतिहासिक विचारांचा महाराष्ट्रात ऱ्हास: राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची टीका – Kolhapur News



महाराष्ट्रात भाषा, संस्कृती, साहित्य अन् ऐतिहासिक विचारांचा ऱ्हास होत असून आजच्या राज्यकर्त्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची टीका 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी केली आहे.

.

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांनी आज कराड येथील प्रीतीसंगमावरील सातारा जिल्ह्यातील सुपुत्र व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी थेट अध्यक्षांनीच लेखक आणि राज्यकर्त्यांवर टीका केल्याने प्रत्यक्ष साहित्य संमेलनात त्याचे पडसाद उमटणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण ही माणसे ग्रंथ वेडी होती. परंतु त्यांच्याच महाराष्ट्रात आज ग्रंथालय ग्रंथालयांना घरघर लागलेली आहे अनेक ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. ही साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने फारच गंभीर घटना आहे, असेही विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.

ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना रोजगार हमी वरील कामगारांपेक्षाही कमी वेतन मिळते ही दुर्दैवाची बाब आहे, अशीही टीका विश्वास पाटील यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *