![]()
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जालन्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले पक्ष आणि घराणी जालन्यात एकत्र आली आहेत. जालना महानगर
.
जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतून बाहेर पडत सर्वांना धक्का दिला. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यावर अजित पवार गटाने तातडीने मनसे आणि वंचित बहुजन आघाडीशी संधान साधले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी या नव्या आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित
या नव्या आघाडीत जागावाटपाचे समीकरणही स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 50 जागांवर आपले उमेदवार उतरवणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 6 जागा देण्यात आल्या आहेत. पहिल्या महापौराच्या खुर्चीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.
राज्यातील 29 महापालिकांमध्ये स्थानिक नेत्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिल्यामुळे अनेक ठिकाणी कुठे शत्रू तर कुठे मित्र असे चित्र दिसत आहे. जालन्यात मात्र भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र लढत असल्याने आणि अजित पवार गट नव्या मित्रांसोबत मैदानात उतरल्याने ही निवडणूक चौरंगी आणि चुरशीची ठरणार आहे. जालन्याच्या पहिल्या महापौरपदाचा मान कोणाला मिळणार आणि हे ‘अजित पवार-राज ठाकरे’ हे समीकरण यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
