महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून आज त्यांचे निकाल जाहीर होत आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकांच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. त्यामुळ
.
मात्र अनेक नागरिकांच्या मनात एक प्रश्न आहे.
– नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिका म्हणजे नेमकं काय?
– यामध्ये काय फरक असतो?
– या निवडणुकांचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी काय संबंध आहे?
– या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दांत समजून घेऊया.
शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? भारतामध्ये लोकशाही तीन पातळ्यांवर चालते
1. केंद्र सरकार
2. राज्य सरकार
3. स्थानिक स्वराज्य संस्था
यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या गाव, शहर आणि परिसराचा कारभार थेट लोकप्रतिनिधी चालवतात अशी व्यवस्था.
शहरी भागासाठी या संस्थांना म्हणतात –
– महापालिका
– नगरपरिषद
– नगरपंचायत
नगरपंचायत म्हणजे काय? नगरपंचायत कोणासाठी असते?
नगरपंचायत ही गावातून शहराकडे वाटचाल करणाऱ्या भागांसाठी असते. जिथे लोकसंख्या वाढते आहे, बांधकाम वाढत आहे, पण पूर्ण शहराचा दर्जा मिळालेला नाही, अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन केली जाते.
लोकसंख्या किती?
साधारणपणे 11 हजार ते 25 हजार लोकसंख्या असलेल्या भागात नगरपंचायत असते.
नगरपंचायतीची कामे – पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, प्राथमिक स्वच्छता
नगरपंचायतीतील प्रमुख पदे
– नगराध्यक्ष
– उपनगराध्यक्ष
– सदस्य
– मुख्याधिकारी (शासन नियुक्त)
नगरपरिषद म्हणजे काय? नगरपरिषद कोणासाठी?
नगरपरिषद ही मध्यम आकाराच्या शहरांसाठी असते. जी शहरे खूप मोठी नाहीत, पण गावापेक्षा खूप विकसित आहेत.
लोकसंख्या किती? 25 हजार ते 3 लाखांपर्यंत लोकसंख्या, नगरपरिषदेची कामे, पाणीपुरवठा, रस्ते, नाले, बाजारपेठांचे नियोजन, कर वसुली, आरोग्य व स्वच्छता
नगरपरिषदेत कोण असतात?
– नगराध्यक्ष
– नगरसेवक
– मुख्याधिकारी
महापालिका म्हणजे काय? महापालिका कुठे असते?
महापालिका ही मोठ्या शहरांसाठी असते, जिथे लोकसंख्या जास्त आणि कारभार व्यापक असतो.
लोकसंख्या किती? साधारणपणे 3 लाखांपेक्षा जास्त, उदाहरणे- मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर
महापालिकेची कामे- पाणीपुरवठा, ड्रेनेज व कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, रुग्णालये, शाळा, कर वसुली, शहर विकास नियोजन
महापालिकेतील प्रमुख पदे
– महापौर
– उपमहापौर
– नगरसेवक
– आयुक्त (IAS अधिकारी)

आज नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल का महत्त्वाचे?
राज्यात नुकत्याच अनेक नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आज त्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असल्याने स्थानिक सत्ता कुणाच्या हातात जाणार? कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळतो? आगामी महापालिका निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुका का महत्त्वाच्या?
महापालिका म्हणजे राजकारणाची मोठी रणभूमी. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांतील महापालिकांवर सत्ता मिळवणे म्हणजे आर्थिक ताकद, राजकीय वर्चस्व, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी भक्कम पाया म्हणूनच सध्या महापालिका निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्ष तयारीला लागले आहेत.
