Shiv Sena (Shinde Group) Warns BJP Over Alliance, Signals Solo Fight in Solapur Civic Polls | सोलापुरात शिंदेसेनेचा भाजपला दुपारी कडक इशारा: सायंकाळी युतीची चर्चा, भ्रमात राहाल तर फसाल, तुमचे 500 इच्छुक आमच्याच संपर्कात – Solapur News



हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यासाठी आम्ही युतीचा प्रस्ताव भाजपकडे दिला. पण, त्यांच्याकडून योग्य सन्मान मिळालेला नाही. भाजप नेत्यांनी भ्रमात राहू नये. तसे झाल्यास फसतील. भाजपकडे इच्छा व्यक्त केलेले 500 लोक आमच्या संपर्कात आहेत. संपूर्ण 26 प्रभागां

.

जिल्हा संपर्कप्रमुख कदम म्हणाले, ‘महायुती नाही झाली तरी लढायचे आहे. नेत्यांनीच निवडणूक लढवावी. मजबूत उमेदवार देण्याचाही प्रयत्न करू. किंगमेकर कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षात एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाईल.’ जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, ‘आपल्यासमोर बलाढ्य शक्ती आहे. भाजपचे 3 आमदार सत्तेचा वापर करून माणसे पक्षात घेत आहेत. 1200 इच्छुकांचे अर्ज आल्याचे सांगत आहेत. पण, त्यापैकी 500 जण आमच्या संपर्कात आहेत. त्यांना मस्ती आली. आम्ही मागे हटणार नाही.’

भाजपकडून अजून प्रतिसाद नाही

शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ताकद मोठी आहे. शिवाय तब्बल 1200 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा महापालिका ताब्यात घेण्याचे उद्दिष्ट घेतले. त्यासाठी स्वबळावर लढण्याचीच तयार सुरू केली. शिंदेसेनेने दिलेला 25 जागांचा प्रस्ताव मान्य नसल्याचे संकेत दिले. त्यामुळेच शिंदेसेनेनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. युतीसाठीही हात पुढे केले.

महायुतीसाठी चर्चेची दुसरी फेरी आज

  • आम्ही स्वतःहून युतीचा प्रस्ताव मांडला म्हणजे आमची ताकद कमी आहे असे समजू नये. आमच्या अस्तित्वावर बोलाल तर आम्हाला लढावेच लागेल. पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी 15 जानेवारीपर्यंत मतभेद बाजूला ठेवून काम करावे. सोलापूर महापालिकेवर एकहाती सत्ता आणण्याची ताकद असल्याचे दाखवून द्यावे. त्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागणे आवश्यक आहे. ज्योती वाघमारे, प्रदेश प्रवक्त्या
  • युद्ध फक्त मनोबलावर होत असते. त्यामुळे आत्मविश्वास बाळगा. प्रस्थापितांना विस्थापित करण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे. उमेदवारी ज्याला मिळेल, त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे. शहाजी पाटील, माजी आमदार

राष्ट्रवादी अजित पवार गट येण्याची शक्यता

शुक्रवारच्या महायुती चर्चेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारीही सहभागी होतील. त्यांनी ‘अब की बार 75 पार’ असा नारा देऊन ‘एकला चलो रे…’ ची भूमिका घेतली होती. परंतु वरिष्ठ स्तरावरूनच महायुती करण्याचे संकेत मिळाले. त्यानंतर गुरुवारी भाजप-शिंदेसेना एकत्र येऊन प्राथमिक चर्चा केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नव्हते. शुक्रवारच्या बैठकीला मात्र त्यांचे पदाधिकारी येतील. त्यांना किती जागा हव्यात, कोणत्या प्रभागात त्यांचा प्रभाव आहे, याची चर्चा होईल. त्यानंतर त्यांच्यासोबतही जागा वाटपसंदर्भात चर्चा होईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

बंडखोर शिंदेसेनेला मिळण्याच्या भीतीने भाजप महायुतीसाठी तयार

भाजपकडे 1200 पेक्षा अधिक इच्छुक आहेत. तिकीट वाटपातून सुमारे 900 जण नाराज होतील. ते शिंदेसेनेला मिळतील. त्याचा फायदा शिंदेसेनेला होऊ शकतो. त्यामुळे भाजपा महायुती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिंदेसेनेतील काही निवडक मंडळी युती करून स्वत:ची जागा सुरक्षित करून घेण्याचा डाव आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले तरी त्यांचे ते दबावतंत्र असल्याचेही मानले जाते.

इनसाइड

महापालिका निवडणूक प्रक्रिया काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, महायुती करण्यासाठी गुरुवारी घटक पक्षांची प्राथमिक चर्चा झाली. भाजपच्या शहराध्यक्षा रोहणी तडवळकर, शशी थोरात, शिवसेनेकडून संजय कदम, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, मनीष काळजे आदी या चर्चेसाठी गुरुवारी एका हॉटेलमध्ये एकत्र आले होते. कोण आणि कोणत्या जागेवर दावा करणार, याबाबत दोन्ही पक्षांनी अहवाल तयार करून पुन्हा जागा निहाय चर्चा करण्याचे ठरले. त्यातून नेमकी संख्या समोर येईल. त्यावर जागावाटप होऊ शकेल, अशी समाधानकारक ही चर्चा होती, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी शिवसेना समन्वय समितीच्या बैठकीत जागानिहाय चर्चा होईल, असेही सूत्र म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार नव्हते. त्यावेळी महापालिका निवडणुकीत 25 जागा देण्याचे ठरले होते. त्यानुसार भाजपने सन्मानाने 25 जागा द्याव्यात, असा प्रस्ताव शिंदेसेनेने ठेवलेला होता. परंतु त्याला भाजपने दाद दिली नाही. योग्यतेनुसार जागा मिळतील, असे सांगून हिणवले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन भाजपवर तुफान फटकेबाजी केली.

बैठकीत आक्रमक भूमिका मांडून स्वबळाचा नारा दिला

आमच्या मनात आजही महायुती आहे. ती भाजपच्याही मनात असायला हवी. जर भ्रमात राहाल तर फसाल. पालिकेत शिवसेनेच्या 50 जागा निवडून येतील. निवडणूक रणांगणात आम्ही उतरलो तर रक्ताचे पाणी करू. उत्तमप्रकाश खंदारे, माजी मंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *