![]()
खुलताबाद शहरात शासकीय प्रशासन बेवारस झाल्याचेचित्र मंगळवारी समोर आले. ‘नोकरी आमची,पगार शासनाचा आणि जबाबदारी कुणाचीचनाही’, अशा थाटात अनेक विभागांचेअधिकारी सर्रास कार्यालयात दांडी मारतअसल्याचे उघड झाले आहे. या दांडीबहाद्दरअधिकाऱ्यांना ना वरिष्ठां
.
खुलताबाद तालुक्यात शहरासह ७३ ते ७४ गावे असून संपूर्ण तालुक्याचा प्रशासकीय कारभार काही मोजक्या शासकीयकार्यालयांवर अवलंबून आहे. दररोज शेकडो शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला व नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. मात्र ‘कार्यालय उघडे, पण अधिकारी गायब’ हेच रोजचे वास्तव बनले आहे.
अधिकारीच नव्हे, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंतेही गायब
फक्त वरिष्ठ अधिकारीच नव्हे, तर अनेकशाखा अभियंते व कनिष्ठ अभियंतेहीविविध बहाण्यांखाली कार्यालयात गैरहजरराहत असल्याची खुलेआम चर्चा आहे.त्यांना जाब विचारणारा कुणी नसल्यानेमनमानी कारभार बिनधास्त सुरू आहे.शासनाच्या पगारावर ऐषाराम आणिजनतेच्या कामांची उघडपणे थट्टा सुरूअसल्याचा संताप नागरिक व्यक्त करतआहेत. मंगळवारी सामाजिक वनीकरणविभागात कुणीच हजर नव्हते. तर,सार्वजनिक बांधकाम व लघुसिंचनविभागात प्रत्येकी एक कर्मचारी आढळूनआला.
नेहमी ठरलेली उत्तरे
सार्वजनिक बांधकाम वलघुसिंचन विभागाचे उपअभियंतेअधूनमधून कार्यालयाला धावतीभेट देतात आणि साइटवर आहेकिंवा छत्रपती संभाजीनगरलाबैठकीत आहे, असे ठरलेले उत्तरनेहमीच नागरिकांना दिले जाते.
दांडीबहाद्दरांना वरिष्ठांचाही धाक नाही, नागरिकांच्या कामासाठी फेऱ्या
अनेक शासकीय कार्यालयांमध्येअद्याप बायोमेट्रिक (थम) हजेरीप्रणाली नसल्यानेअधिकारी-कर्मचाऱ्यांना मोकळेरान मिळाले आहे. सर्वकार्यालयांत तातडीने थम सिस्टीमबसवून दररोज हजेरी बंधनकारककरावी, अशी जोरदार मागणीशेतकरी व नागरिकांकडून होतआहे.
Q-अनेक कार्यालयांतील अधिकारी वेळेत येत नाही?
A. याबाबत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल.
Q-अधिकारी, कर्मचारी वेळेत यावे, यासाठी काय करणार?
A. सर्वांना वेळेवर येणे व उपस्थित राहण्याबाबत सूचना देऊन पाळन करण्याबाबत आदेश दिले जातील.
Q- सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होण्याबाबत काय करणार?
A. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या जातील. तसेच ज्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, अशांवर कारवाई केली जाईल.
बायोमेट्रिक हजेरी आता बंधनकारक करावी
