![]()
जळालेल्या पिक व साहित्याची पाहणी करताना महावितरणचे अधिकारी-कर्मचारी व स्वत: शेतकरी.
तिवसा तालुक्यातील मौजा शिरजगाव मोझरी येथे कृषी पंपाच्या नादुरुस्त डीपीमुळे एका शेतकऱ्याच्या शेतात आग लागली. या आगीत ऊस आणि तूर पिकाचे मोठे नुकसान झाले असून, ठिबक सिंचनाचा संचही जळून खाक झाला आहे. या घटनेनंतर महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटन
.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव प्रभाकर घाटोळ आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता पुढे येत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डीपी नादुरुस्त असल्याची तक्रार वेळोवेळी विद्युत विभागाकडे करण्यात आली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडली.
शेतकऱ्यांच्या निरीक्षणानुसार, डीपीचे नियमित मेंटेनन्स होत नसल्याने आग लागण्याचा धोका वाढला आहे. घटनेच्या एक दिवसाआधी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मौजा शिरजगाव शिवारातील नादुरुस्त डीपीत स्पार्किंग होताना दिसले होते. वारंवार असे घडल्याने अखेर प्रभाकर घाटोळ यांच्या शेतातील पिके जळाली.
या आगीची तक्रार तिवसा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. तसेच, विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता, तलाठी आणि कृषी विभागासह शिरजगाव मोझरीच्या पोलिस पाटील शारदा देवघरे यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.
खरिपाचे पीक अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रभाकर घाटोळ यांनी दुसऱ्यांदा ऊसाचे पीक घेतले होते. काही दिवसांतच त्यांच्या शेतातील ऊस काढण्यात येणार होता, मात्र नादुरुस्त डीपीमुळे तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.
दरम्यान, विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नाईक, तलाठी माळोदे आणि कृषी सहाय्यक कुंभारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाईचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात येईल, असे उईके यांनी स्पष्ट केले.
शिरजगाव मोझरी, शिवणगाव, मालधूर, कोळवण, धोत्रा, वऱ्हा, माळेगाव आणि शेंदोळा बु. या शिवारात मोठ्या प्रमाणात नादुरुस्त डीपी आहेत. अशा डीपीमधील ऑइल गळती किंवा स्पार्किंगमुळे भविष्यातही शेतकऱ्यांचे पीक जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत विभागाने अशा डीपींची नियमित दुरुस्ती करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शेतकरी प्रभाकर घाटोळ यांनी सांगितले की, “नादुरुस्त डीपीमुळे लागलेल्या आगीत माझे सुमारे ३.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्युत विभागाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशी घटना घडू नये याचीही काळजी घ्यावी.”
