मोठी बातमी:शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आज घेतला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; मात्र आचारसंहितेमुळे घोषणा नाही
![]()
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेली असून, याबाबतचा निर्णय आज घेतला जाणार आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा तातडीने करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा तातडीने करता येणार नाही. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सरकारला काही बाबींमध्ये संयम बाळगावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे या निर्णयाची सार्वजनिक घोषणा विधान परिषद निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांकडून वसूल केले जाणार दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती उघड केली. योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करताना 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. महिलांसाठी असलेल्या या योजनेत चुकीची माहिती देऊन लाभ मिळवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने संबंधित व्यक्तींवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. ज्या पुरुषांनी योजनेतून लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारी योजनांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजनांचा लाभ मिळेल यासाठी तपासणी अधिक काटेकोर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
