Konkan Heatwave & Marathwada Rain; 7 Districts Yellow Alert

0
db-temp-cover-marathi-2026-05-06t093602053_1778040402.jpg



राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून ६ मे रोजी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने एकूण ७ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढल्याने उकाडा असह्य ह

.

मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्म व दमट हवामानासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात कमाल तापमान ३४ ते ३७°C पर्यंत राहील, मात्र आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उकाडा अधिक जाणवेल. पुण्यात बुधवारी आकाश कोरडे राहील. किमान २२°C आणि कमाल ३९°C तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी उष्ण वारे वाहणार असल्याने नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यात पावसामुळे उन्हापासून दिलासा

उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या सोलापूरकरांना बुधवारी दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आधार मिळणार आहे. धाराशिव आणि लातूर: या दोन जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जरी पाऊस पडणार असला, तरी तापमानाचा पारा ३८ ते ४०°C दरम्यानच राहणार असल्याने उन्हाचा तडाखा कायम असेल, मात्र पावसाने तात्पुरती विश्रांती मिळेल. नांदेड: जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी कोणताही विशेष इशारा (Alert) देण्यात आलेला नाही.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र: सर्वाधिक उष्णता

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये उष्णतेची तीव्रता कायम असून पारा ४०°C च्या आसपास राहील. मात्र, सर्वाधिक उष्णतेची नोंद नागपूरमध्ये होण्याची शक्यता असून, तिथे पारा ४२°C पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *