पुनद पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहार:शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे मंत्री भुसे यांना निवेदन
![]()
शहरासाठी जीवनदायी मानल्या जाणाऱ्या पुनद पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ४६ कोटी मूळ किंमत असलेली ही योजना थेट ५२ कोटीपर्यंत वाढविण्यात आल्याचा गंभीर आरोप सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने क
.
योजनेतील अनेक कामे निकृष्ट असून जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्था आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना अपेक्षित पाणीपुरवठा मिळत नाही. योजनेच्या कामातील तब्बल ९० टक्के बिले काढण्यात आली असून, प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण व दर्जाहीन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
