गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात वॉचमनला अटक, मालकांना क्लीन चीट?:योगी आदित्यनाथांनी इतर राज्यात प्रचाराऐवजी युपीमध्ये रोजगार निर्मितीवर लक्ष द्यावे- संदीप देशपांडे
![]()
गोरेगाव नेस्कोमधील वॉचमनला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने लाच घेऊन ड्रग्ज विकणाऱ्याला मध्ये सोडले असा बनाव करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.एका वॉचमनला पकडून हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, नेस्कोचे मालकांना चौकशीला बोलवत नाही, हा काय प्रकार आहे, त्यांना क्लीन चीट द्यायचे ठरवले आहे का? श्रीमंत लोकांना सोडण्याचे तुम्ही ठरवले आहे का? याचे उत्तर सरकार आणि पोलिसांना द्यावे लागेल, असे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ निवडणुकीच्या वेळी इतर राज्यात जाऊन प्रचार करतात. त्यांनी त्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या राज्यात रोजगार कसा निर्माण होईल याकडे पाहिले पाहिजे. आपल्या राज्यातील लोकांना रोजगारासाठी बाहेर पडावे लागू नये यासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रयत्न केले पाहिजे. मनसेचा संपला पाठिंबा नाही संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना कोणत्याही संपला पाठिंबा देणार नाही. मराठी रिक्षाचालक या संपात सहभागी होणार नाही. अमराठी लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न तर करुण बघावा मग बघू. ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते ते वाद घालणार आणि आम्ही शांत रहायचे का? सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्हाला करता येतो. महाराष्ट्राची भाषा मराठीच संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वच मराठी भाग आहेत, कुठेही हिंदी भाग नाही. किंवा कुठल्याही परिसराची भाषा गुजराती भाषा नाही. सदावर्ते यांना आक्रमक भूमिका घेऊन घरातच बसायचे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेला महत्त्व देत नाही. सर्वांनी मराठी बोललेच पाहिजे, आता लोकं मराठी बोलत आहेत. स्थानिक भाषा आलीच पाहिजे संदीप देशपांडे म्हणाले की, रिक्षाचालक मराठी बोलत असेल तर आम्हाला काही हरकत नाही. महाराष्ट्रात राहता तर इथली भाषा तुम्हाला आलीच पाहिजे. जर्मनीमध्ये गेलात तर त्यांची भाषा शिकावी लागते नाहीतर जॉब मिळत नाही. इतर राज्यात त्यांची त्यांचीच भाषा बोलली जाते मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे. आमची मराठी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. रिक्षाचा परवाना देताना तुम्हाला स्थानिक भाषा येणं गरजेचे आहे, हा नियम काही केवळ महाराष्ट्रात नाही तर सुरतमध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे. हा नियम जुनाच आहे.इतर राज्यातून आलेले प्रशासकीय अधिकारी मराठी शिकतात ना. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे संदीप देशपांडे म्हणाले की, संजू जैस्वाल नावाच्या अधिकाऱ्यांने जी सामान्य व्यक्तीला दादागिरीची भाषा वापरली हे काय पहिल्यांदा घडलेले नाही.यापूर्वी सुद्धा त्यांच्याकडे काही जण तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला केबिनमध्ये मारहाण करण्यात आली होती. कोणते हिंदी चित्रपट पाहून हे अधिकारी बिघडलेत माहिती नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्यात गॅस संदर्भात डोळे उघडे ठेवले पाहिजे. ग्रामीण भागातील गॅस टंचाईबद्दल सरकारले डोळेझाकपणा करू नये.
