मी सरकारचा भाग नाही, केवळ एक आमदार- सुधीर मुनगंटीवार:मनोज जरांगेंच्या आंदोलनावरही दिली प्रतिक्रिया

[ads1]


मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार नेहमीच संवाद करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. संवादातूनच समाधानाकडे जाण्याचा मार्ग असतो, असे मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात तीन वेळा सरकार संवादासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि आंदोलकांमध्ये संवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी सरकारच्या भूमिकेबाबत भाष्य केले. दरम्यान, आपल्या भूमिकेबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी आपण सरकारचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. ‘मी सरकारचा भाग नाही, मी आमदार आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून बोलत आहे,’ असे त्यांनी सांगितले. पुण्यात भाजप कार्यकारिणीची बैठक दरम्यान, पुण्यात आज भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सुधीर मुनगंटीवार पुण्यात दाखल झाले आहेत. पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीसह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुण्यात भाजप कार्यकारिणीची बैठक दरम्यान, आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते पुण्यात दाखल झाले आहेत. ही बैठक रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीविषयी माहिती देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “पुण्यात ही कार्यकारिणीची बैठक व्हावी, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची तीव्र इच्छा होती. त्यांच्या आग्रहाखातरच या बैठकीचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.” या महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार असून, ते उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. फडणवीस बैठकीत कोणते मुद्दे मांडतात आणि राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय भूमिका व्यक्त करतात, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस: प्रकृती खालावली तरी उपचार नाकारले; सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा भेट घेण्याची शक्यता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सलग उपोषणामुळे जरांगे पाटील यांची शुगर काही प्रमाणात खालावली असली, तरी त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. दरम्यान, रविवारी परभणीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. उपोषणस्थळी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राठोड व त्यांच्या पथकाने जरांगे यांची तपासणी केली. तपासणीत त्यांची शुगर कमी झाल्याचे समोर आल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला. मात्र, जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यानंतर दुपारी आणि सायंकाळी गेलेल्या वैद्यकीय पथकालाही त्यांनी माघारी पाठवले. सध्या त्यांचा रक्तदाब, नाडीचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *