![]()
पुण्यात नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडल परिवार यांच्या वतीने ‘भारत विमर्श’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे. नव्या पिढीला देशाचा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा कळावा, तसेच भारतीय ज्ञान प्रणालींच्या सखोल पैलूंचे आकलन व्हावे, हा या उपक्
.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना भोसले म्हणाले की, तरुण पिढीला देशाची प्रगतशील संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि प्राचीन भारतीय मूल्यांची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या आवृत्तीमध्ये ‘बोध’ या थिंक टँकचे सह-संस्थापक आणि भारतीय शिक्षण व तत्त्वज्ञान विषयाचे तज्ज्ञ पंकज सक्सेना तसेच इतर संबंधित विषयांचे तज्ज्ञ ‘देवालय’, ‘ईशान्य भारत’ आणि ‘इतिहास’ यासंबंधी विषयांवर आपले विचार मांडतील.
कार्यक्रमाची सुरुवात पंकज सक्सेना यांच्या उद्घाटनपर भाषणाने होईल. त्यानंतर ‘देवालय’ या विषयावरील चर्चासत्रात पंकज सक्सेना यांच्यासोबत प्रसिद्ध लेखिका, संशोधिका, भारतीय इतिहास, भारतीय वारसा, मूर्तिकला आणि हिंदू मंदिरांच्या वास्तुकलेवरील ब्लॉगर मोनिदीपा बोस डे सहभागी होतील. तसेच ‘टेम्पल हेरिटेज ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक आणि ‘लॉस्ट टेम्पल्स’, ‘टुरिझम टीचर’ यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्राचीन मंदिरांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणारे रामकृष्ण कोंगाल्ला देखील यात सहभागी होणार आहेत.
यानंतर ईशान्य भारतावर आधारित ‘इशाना’ या सत्रात पंकज सक्सेना यांच्यासोबत इंडिजिनस फेथ अँड कल्चरल सोसायटी ऑफ अरुणाचल प्रदेशच्या सरचिटणीस, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांच्या जतन व संवर्धनासाठी नीलम निडो पुरस्कार विजेत्या आणि अरुणाचल प्रदेश सरकारच्या महिला व बाल विकास विभागात बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या माया मुरतेम सहभागी होतील. त्यांच्यासोबतच आझाद हिंद फोर्स, इम्फाळ फ्रंटचे संस्थापक सदस्य आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती वर्षासाठी पंतप्रधानांनी नेमलेल्या राष्ट्रीय समितीचे सदस्य प्रेमानंद शर्मा हे देखील आपले विचार मांडतील.
दुपारच्या ‘इतिहास’ सत्रात प्रसिद्ध लेखिका अमी गनात्रा, रामायण आणि तमिळ साहित्याचे विद्वान जटायू, तसेच सर जदुनाथ सरकार फेलोशिप फॉर इंडियन हिस्ट्रीचे रिसर्च फेलो, ‘फ्रॅक्टल मंडला-ए हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया’ या पुस्तकाचे आणि ऐतिहासिक काल्पनिक कादंबऱ्यांच्या मालिकेचे लेखक अमृतांशु पांडे यांचा सहभाग असेल. चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक आणि माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या भाषणाने ‘भारत विमर्श’ या कार्यशाळेचा समारोप होईल.
