छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेना भवनात आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून साडेतीनशे उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात हे अ
.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने मुलाखती पार पडल्यानंतर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक उमेदवार ढोल वाजवत आपला अर्ज सादर करत आहे. अनेक उमेदवारांनी कट-आउट्स लावून आणि ‘मशाल’ चिन्हाचा वापर करून या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, शिवसेना पुन्हा पूर्ण ताकदीने उभी राहावी यासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज शिवसेना भवनात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरप्रमुखांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले होते, जे आता शिवसेना भवनात स्वीकारले जात आहेत. यामुळे शहरात निवडणुकीचा माहोल तयार झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य आणि सुभाष पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आढावा बैठक घेतली होती.

