पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी 40 आमदार का गेले ते बघा:उबाठाने विधान परिषदेची निवडणूक लाहोर-रावळपिंडीत लढवावी- नवनाथ बन
![]()
पार्थ पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी लक्ष्यात घ्यावे की आदित्य ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून तुमच्या पक्षातील 40 आमदार बाहेर पडले. आदित्य ठाकरेंची दादागिरी सर्वांनी पाहिली आहे, मातोश्रीचे दारं आमदारांसाठी कशी बंद होती हे सर्वांना माहिती आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकांनी तुमची साथ सोडली तुम्ही तुमच्या पक्षाकडे बघा इतरांचे पक्ष चालवायला त्या पक्षाचे नेते सक्षम आहे. नवनाथ बन म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी कारवाई केली म्हणून यांना पोटशूळ उठला होता. कारण त्यांची आणि पाकिस्तानची जवळीक आहे. राऊतांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले? तुम्ही उबाठाचे प्रवक्ते म्हणून शोभत नाही, तु्म्ही पाकिस्तानचे प्रवक्ते शोभतात. देवाभाऊ गुन्हेगारांना पाठिशी घालत नाही नवनाथ बन म्हणाले की, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगारांना पाठिशी घातले ते जर पाहिले तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, ही टॅग लाईन उद्धव ठाकरेंची होती. देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना पाठिशी घालत नाहीत. कालच जे पोलिस दोषी आहेत त्यांना निलंबित करण्याची हिंमत देवाभाऊ यांनी केली आहे. सचिन वाझे यांचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरेंना तुम्ही सवाल केला होता का? असा सवाल बन यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ कोणालाही पाठिशी घालत नाहीत. कोणत्या आमदारांचे अवैध दारुचे धंदे? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात. ते कुठली दारू पिऊन पत्रकार परिषद घेतात याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. ज्या आमदारांवर राऊतांनी आरोप केले त्याचे पुरावे त्यांनी द्यावे. कोणत्या आमदारांचे अवैध दारु वाल्या आमदारांचे धंदे आहेत हे सांगितले पाहिजे. यांचेच समर्थक अवैध दारुंचा धंदा करतात. 17 जागा आम्हीच जिंकणार नवनाथ बन म्हणाले की, विधान परिषदेच्या 17 जागांवर तुमचे 17 उमेदवार उभे केले तरी काही फरक पडणार नाही. कारण 17 पैकी 17 जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकतील. ही निवडणूक 17 विरुद्ध 0 असे आम्ही जिंकणार आहोत. तुम्ही लाहोर किंवा रावळपिंडीमध्ये विधान परिषदेची निवडणूक लढवावी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे.
