IMD Alert | महाभयंकर वादळ महाराष्ट्राला धडकणार! ‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा रेड अलर्ट
IMD Alert | देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या तीव्र उष्णतेचा कहर सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तासांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. काही भागांमध्ये प्रतितास १०० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मुसळधार पाऊस, गारपीट आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे झाडे कोसळणे, घरांवरील पत्रे उडून जाणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असतानाच अचानक बदललेल्या हवामानामुळे मोठे नुकसानही झाले आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana) आणि चंदीगड (Chandigarh) या भागांमध्ये प्रतितास १०० किलोमीटर वेगाने वादळ धडकू शकते. यासोबत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये गारपीट होण्याचाही अंदाज आहे. हरियाणासह उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पश्चिम बंगाल (West Bengal), सिक्कीम (Sikkim), बिहार (Bihar) आणि झारखंड (Jharkhand) या राज्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
IMD Alert | महाराष्ट्रात पावसासोबत उष्णतेचाही तडाखा :
मान्सूनच्या हालचालींबाबतही हवामान विभागाने मोठी माहिती दिली आहे. मान्सून वेगाने भारताच्या दिशेने पुढे सरकत असून पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्र (Arabian Sea), बंगालचा उपसागर (Bay of Bengal) आणि लक्षद्वीप (Lakshadweep) परिसरातील काही भागांमध्ये त्याची एन्ट्री होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी अनुकूल हवामान तयार झाल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम असून तापमान उच्चांक गाठत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. हवामानातील अचानक बदलामुळे पुढील काही दिवस राज्यात उष्णता आणि अवकाळी पावसाचे दुहेरी संकट पाहायला मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
