बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात:महाराष्ट्रात झुंडशाहीच्या जोरावर हुकूमशाही सुरू आहे का? लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर निशाणा
![]()
ओबीसी रकाण्यात यापुढे केवळ मराठा कुणबी असणार का? मनोज जरांगे यांच्या सांगण्यावर मराठा कुणबी ओबीसीत आला असेल तर त्यांच्या स्पर्धेत मराठा कुणबी स्पर्धेत टिकू शकत नाही, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 60 टक्के लोकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात मुख्यमंत्री फेल झाले आहेत. आमचे अधिकार संपले आहे, यावर कोणताही पक्ष बोलत नाही, आमच्या समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे नावाच्या माणसाला अक्कल नाही. सामाजिक, राजकीय आंदोलनातील गुन्हे हे संपलेले असतात. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे असतील ते मागे घेता येणार नाहीत. सरकारने जर गंभीर गु्न्हे मागे घेतले तर सरकार काय भूमिका घेते असे म्हणावे लागेल. सरकारने जरांगेचे लाड करू नये. आम्ही सुद्धा तुम्हाला निवडून दिले आहे. जेन झी काय करू शकते हे दोन दिवसात कळाले असेलच. सीएम जरांगेंना गांभीर्याने घेत नाही लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर प्रसाद लाड यांना पाठवत असतील तर चिंतेची बाब आहे. एखादा उद्योग करणारा माणूस या चर्चेला पाठवला म्हणजे मुख्यमंत्री जरांगेंना गांभीर्याने घेत नाही. जरांगे पाटील यांचा अभ्यास नाही, त्यांना राजकीय लोकं स्क्रीप्ट पाठवतात. फडणवीसांची खूर्ची हलवण्यासाठी हे आंदोलन आहे. म्हणून प्रसाद लाड यांच्या सारख्या माणसाला मुख्यमंत्र्यांनी पाठवले आहे. जातनिहाय जात गणना झाली पाहिजे लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी समाजाची जातनिहाय जात गणना झाली पाहिजे. संख्या न कळाल्याने योजनांना निधी मिळत नाही. समाज सत्तेत नसल्याने आपल्या समाजाचे अधिकार राज्यकर्त्यांनी काढून घेतले आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर 100 सभा घेणार आहोत. या माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत. झुंडशाही कोण करते हे जनतेला माहिती आहे. मुंबईमध्ये जात तिथे जनतेना कोण वेठीस धरते आहे? कुणबी दाखले द्या कोण म्हणत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले लक्ष्मण हाके म्हणाले की, झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्रात कोणी हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करत आहे का? हा आमचा सवाल आहे. आमचे राजकीय आरक्षण डुबले आहे. महत्त्वाच्या ओबीसी आरक्षणावर कुणबी मराठा रुप बघायला मिळाले. एका नगरपरिषदेत ओबीसींच्या 9 पैकी 9 जागा मराठा कुणबी हे फेक प्रमाणपत्र असलेले लोकं निवडून आले.ओबीसीच्या बाबतीमध्ये दुजाभाव झाला. हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आली.
