Mumbai MP Sanjay Dina Patil Abuses Journalists; CM Shinde Condemns


खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेली शिवीगाळ आणि त्यांना मारण्याची दिलेली धमकी यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी यावर सारवासारव करत

.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समज आणि दिलगिरीची सूचना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी अशा प्रकारे वर्तन करणे चुकीचे आहे. “मी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतो. पत्रकारांशी अशा प्रकारे बोलणे योग्य नाही,” असे शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणाले की, मी संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी आपली बाजू मांडली आहे. पाटील यांनी सांगितले की, “पत्रकारांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मात्र, दररोज माझ्या विरोधात आणि माझ्या कुटुंबाबद्दल ज्या खालच्या पातळीवर टीका केली जात आहे, त्याचा राग मनात होता.” उपमुख्यमंत्र्यांनी संजय दिना पाटील यांना स्पष्ट सांगितले आहे की, “जर अनावधानाने काही अपशब्द गेले असतील, तर पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करा.”

“प्रवासात आहे, माहिती घेऊन बोलतो” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली. “मी प्रवासात असल्याने मला या घटनेची सविस्तर माहिती नाही. कोणालाही अशा प्रकारची धमकी देणे किंवा शिवीगाळ करणे योग्य नाही, मात्र पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मी यावर भाष्य करणार नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“वाटल्यास मी माफी मागतो” – शिंदे गटातील नेत्यांची धावपळ

संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची नाचक्की होत असल्याचे पाहून शिंदे गटातील काही नेत्यांनी तातडीने पत्रकार आणि माध्यमांची माफी मागितली आहे.

  • संजय शिरसाट म्हणाले, “संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यातील वाकयुद्धातून हा प्रकार घडला असावा. कोणालाही उघडपणे धमकी देणे किंवा शिवीगाळ करणे योग्य नाही. जर त्यांच्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील, तर मी स्वतः पत्रकारांची माफी मागतो. आम्ही त्यांना नक्कीच समज देऊ.”
  • प्रकाश सुर्वे म्हणाले, “संजय पाटील खूप चांगला माणूस आहे. कदाचित फ्रस्ट्रेशन किंवा रागाच्या भरात अनावधानाने त्यांच्याकडून असे घडले असेल. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
  • अर्जुन खोतकर म्हणाले, “जर तुम्ही सांगताय ते खरं असेल आणि त्यांनी खरंच शिवीगाळ केली असेल, तर ते चुकीचे आहे. लोकशाहीत प्रेस हा चौथा स्तंभ आहे. निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेतील.”

संजय दिना पाटील यांच्या या वादग्रस्त प्रकारानंतर शिंदे गटातील नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांनी या कृतीचे समर्थन न करता तत्काळ माफी मागत असून, हे ‘अनावधानाने’ घडल्याचे सांगितले आहे. तर काही जण राऊतांकडून दररोज होत असलेल्या टीकेमुळे पाटील हतबल झाले होते, असा युक्तिवाद करत अप्रत्यक्षपणे पाटील यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, संजय दिना पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना शिवीगाळ करणे ही बाब सत्ताधारी पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘दिलगिरी व्यक्त करा’ असे सांगितल्याने, आता खुद्द खासदार पाटील यावर काय भूमिका घेतात आणि पत्रकारांची माफी मागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या वाचा…

सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन VIDEO

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

संबधित बातमी वाचा…

सत्तेचा माज अन् मिंधे टोळीची संस्कृती!:पत्रकारांना दिलेल्या शिवीगाळीवरून खासदार संजय दिना पाटलांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक, थेट विधानसभेत पडसाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या ‘बॉम्ब’च्या धमकीनंतर आता नवा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच खासदार पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराचे पडसाद आता थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटले असून, काँग्रेस आणि ठाकरे गटाने या मुजोर वर्तनाविरोधात सरकारला धारेवर धरले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही:कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी

विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन: संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन,” अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *