जागृती आणि शिक्षा:19 गावे नशामुक्त; आता ‘माजी मद्यपी’ इतर 20 गावांना नशामुक्त करतायेत! दारू पिणाऱ्यास 5 हजार रुपये दंड
![]()
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील ‘तळीरामांची गावे’ म्हणून कुख्यात १९ गावे नशामुक्त झाली आहेत. विशेष बाब म्हणजे या गावांमधील घोषित मद्यपी आता आसपासच्या इतर २० गावांना नशामुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहेत. यासाठी त्यांनी रीतसर पथक तयार केले असून ते या गावांमध्ये जनजागृती अभियान चालवत आहेत. ते संवाद साधतात. ‘दारू शरीरासाठी घातक आहे आणि ती कुटुंबाचा नाश करते. त्यामुळे आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका.’ स्थानिक लोक सांगतात की, या १९ गावांतील लोकांना नातेवाईक लग्नसमारंभातसुद्धा बोलावत नसत. गावातील आदिवासी पंचायत, समाजसेवक, ग्रामस्थ, पोलिसांनी गावांत बैठका घेतल्या. समजावण्याचा प्रयत्न केला. एकमत नव्हते, तरीही प्रयत्न सुरूच राहिले. सुमारे ७ वर्षांपूर्वी पंचायतीने दारू पिणाऱ्यावर आणि ज्याच्या घरी दारू पिली गेली, अशा दोघांवरही ५,००० रुपयांचा दंड ठोठावला. अखेर ७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर या जगजागृतीला यश आले. ही गावे नशामुक्त झाली आहेत. बदल : लग्नकार्यांची आमंत्रणे मिळू लागली व्यसन सुटल्यामुळे पैशांची बचत झाली. यामुळे कुटुंबाचा जीवनस्तर उंचावला. त्यांना समाजात सन्मान मिळला. नातेवाइकांनी बहिष्कार टाकला होता, आता ते त्यांना आपल्या घरच्या कार्यक्रमांसाठी आमंत्रणे पाठवत आहेत. शिक्षण… निरक्षर मुलांचे शहरांमध्ये शिक्षण पूर्वी पुरुष आपली कमाई दारूमध्ये उडवायचे. घर महिला चालवत होत्या. आता ते आपल्या मुलांना शहरात शिक्षणासाठी पाठवत आहेत. पक्की घरे बांधली गेली.दारू विकणारे, पिणारे हात किराणा दुकान चालवतात. दूध विकतात. अमरावतीमधील ही १९ नशामुक्त गावे बासपाणी, मांडवा, कोठा, शिरपूर, आकी, घुटी, मांडू, मोगर्दा, तलई, रानामलुर, घोटा, चित्री, बोरी, कारा, बोथरा, जामपाणी, कुसुमकोट (खुर्द), दिया आणि बोड. महिलांच्या हातात पैसा उरला, कर्जातून मिळाली मुक्ती दारूबंदीनंतर पुरुष आता घरखर्च आणि बाजारासाठी महिलांना पैसे देतात. पूर्वी महिलांना मुलांचे पोट भरण्यासाठी वणवण फिरावे लागायचे आणि उधार घेऊन घर चालवावे लागायचे. त्यामुळे त्या कर्जात बुडाल्या होत्या. परंतु आता घरांमध्ये धान्य, भाजीपाला आणि किराणा सामान वेळेवर येत आहे. -दीपक गायन, सामाजिक कार्यकर्ता, मेळघाट येथे यशस्वी झालो, आता इतर गावांना नशामुक्त करणार मेळघाटमधील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना दारूच्या व्यसनात बुडलेले पाहून उद्ध्वस्त संसार बघवले जात नव्हते. म्हणूनच ग्रामस्थांच्या मदतीने दारूबंदी केली. अजून २० गावांना नशामुक्त करू . -प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार, मेळघाट
