नमिता थापर: एआयमुळे आरोग्यसेवेत मानवी स्पर्श मजबूत होईल:'सिमहेल्थ 2026' परिषदेत एमक्युर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिकांचे मत

0
5c098551-ff6a-40e1-bf49-1e21210e94e3_1776520500328.jpg




एमक्युर फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आरोग्यसेवेत मानवी स्पर्श अधिक मजबूत करेल. ‘सिमहेल्थ २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना, त्यांनी भारताच्या आरोग्यसेवेचा प्रवास ‘सुविधांच्या अभावाकडून’ ‘उद्देश्यपूर्ण काळजीकडे’ वळला पाहिजे, असे मत व्यक्त केले. थापर यांच्या मते, एआय आरोग्यसेवा व्यावसायिकांना पुनरावृत्तीच्या कामांमधून मुक्त करून रुग्णांशी अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत करू शकते. त्यांनी पर्यायी उपचारपद्धतींचा समावेश आणि महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर दिला, जे सर्वसमावेशक आणि भविष्याभिमुख आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक आहे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेने १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी ‘सिमहेल्थ २०२६’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. ‘स्मार्ट आरोग्यसेवेचा स्वीकार: भाकीत-आधारित, अचूक आणि वैयक्तिकृत आरोग्य प्रणाली’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे कॅम्पसमध्ये पार पडली. आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरणावर आधारित ही ‘सिमहेल्थ’ परिषदेचे हे २७ वे वर्ष होते. देशातील अग्रगण्य शैक्षणिक परिषदांपैकी एक म्हणून हिने विशेष स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या परिषदेत चिकित्सक, संशोधक, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, आयटी नवोन्मेषक आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह १ हजार ४०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. आरोग्यसेवेच्या भविष्यावर भाष्य करताना, नमिता थापर यांनी भारताच्या ‘थ्री ए’ (उपलब्धता, जागरूकता आणि परवडणारी किंमत) कडे लक्ष देण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यायी उपचार पद्धती आणि महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणाऱ्या भविष्यवेधी दृष्टिकोनाचे समर्थन केले. थापर यांनी स्पष्ट केले की, एआय निदान, क्लिनिकल चाचण्या आणि दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. यामुळे आरोग्यसेवा तज्ज्ञांना सहानुभूती आणि वैयक्तिकृत काळजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्रासोबत आयुर्वेद, पोषण आणि निसर्गोपचार पद्धतींच्या एकात्मिकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि महिलांच्या आरोग्यासाठी अधिक जागरूकता, संशोधन आणि गुंतवणुकीचे आवाहन केले. परिषदेच्या समारोप समारंभास नमिता थापर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. राजीव येरवडेकर (प्रोव्होस्ट, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखा), डॉ. विद्या येरवडेकर (प्रधान संचालिका, सिंबायोसिस व प्र-कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) आणि डॉ. आर. रमण (कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks