स्वच्छ वायू सर्वेक्षण, मुंबई, दिल्लीला‎ मागे टाकत संभाजीनगर देशात 16वे:वर्गवारी वाढल्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग सोपा‎

[ads1]


केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान‎बदल मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण‎२०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर‎महानगरपालिकेने १० लाखांपेक्षा अधिक‎लोकसंख्या असलेल्या देशातील ४८ प्रमुख‎शहरांच्या श्रेणीत थेट १६ वा क्रमांक पटकावला‎आहे. यंदा पालिकेने उत्तुंग झेप घेत २०० पैकी‎१७८ गुण मिळवले. धूळ नियंत्रण, कचरा‎व्यवस्थापन, उघड्यावर कचरा जाळण्यास‎अटकाव आणि नियमित यांत्रिक‎साफसफाईमुळे शहरातील हवेची गुणवत्ता‎मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे.‎ या क्रमवारीत मुंबई (२८ वा क्रमांक),‎देशाची राजधानी दिल्ली (२१ वा क्रमांक),‎बेंगळुरू (३२ वा क्रमांक), कोलकाता (३८ वा‎क्रमांक), चेन्नई (३५ वा क्रमांक) व नाशिक‎(२९ वा क्रमांक) यांसारख्या बड्या शहरांना‎मागे टाकत शहराने ही लक्षवेधी कामगिरी‎बजावली आहे. महापौर समीर राजूरकर,‎आयुक्त अमोल येडगे व घनकचरा विभागाचे‎उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वात‎राबवलेल्या चारस्तरीय उपाययोजनांमुळे ही‎क्रमवारी उंचावण्यास मदत झाली.‎ राष्ट्रीय मानांकनामुळे केंद्राचा ‘एनसीएपी’ निधी वाढणार‎ केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) शहरांच्या‎कामगिरीच्या आधारावर आर्थिक अनुदान दिले जाते. ३४ व्या स्थानावरून थेट‎१६ व्या क्रमांकावर घेतलेल्या भरारीमुळे छत्रपती संभाजीनगरला केंद्र‎सरकारकडून मिळणाऱ्या विशेष निधीच्या रकमेत मोठी वाढ होणार आहे. हा‎वाढीव निधी शहरात नवीन ई-बस खरेदी करणे, हरित पट्टे विकसित करणे‎आणि आधुनिक यांत्रिक झाडू यंत्रे खरेदी करण्यासाठी वापरता येईल.‎थोडक्यात, सुधारलेल्या मानांकनामुळे शहराच्या विकासासाठी केंद्राची तिजोरी‎अधिक खुली होणार आहे.‎ कचरा विलगीकरणावर भर‎ स्वच्छ वायू सर्वेक्षणात छत्रपती‎संभाजीनगर पालिकेची कामगिरी‎वर्षानुवर्षे सुधारत आहे. मागील वर्षी‎(२०२५) शहर देशात ३४ व्या क्रमांकावर‎फेकले गेले होते. मात्र, पालिकेने धूळ‎नियंत्रण, यांत्रिक स्वच्छता‎, ओला -‎सुका कचरा विलगीकरणावर विशेष लक्ष‎केंद्रित केले. परिणामी, यंदा शहराने १८‎स्थानांची मोठी झेप घेत देशात १६ व्या‎क्रमांकावर झेप घेतली.‎ … रस्त्यांवरील धुळीचे काय?‎ पावसानंतर शहरातील रस्त्यांवर धुळीचे‎लोट उठत आहेत. अनेक रस्त्यांची‎झालेली चाळण, ठिकठिकाणी खोदून‎ठेवलेले रस्ते आणि उघड्यावर उडणारी‎धूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.‎कागदावरील स्वच्छ हवा आणि‎रस्त्यांवरील प्रत्यक्षातील धुरळा यातील‎तफावत मनपा कधी दूर करणार, असा‎सवाल नागरिक उपस्थित करत आहे.‎

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *