गणपती नगरात चिमुकले रमले मातीत, तान्हा पोळा उत्साहात साजरा:मोबाईलपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी मातीच्या बैलांचे देखावे साकारत जपली संस्कृती

[ads1]


अमरावती येथील गणपती नगरात श्री संकट मोचन बहुउद्देशीय कला दर्पण म्युझिकल योगा ग्रुप मंडळाने तान्हा पोळ्याचे आयोजन केले होते. मोबाईलच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला सांस्कृतिक परंपरेची जाणीव व्हावी आणि त्यांनी मोबाईलपासून दूर राहून सणाचा आनंद घ्यावा, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाची संकल्पना ॲड. आशिष हाडके आणि सविता हाडके यांची होती. यावेळी संकट मोचन बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष विनोद मोहिते, सचिव किशोर कोठडे, कोषाध्यक्ष राधेश्याम शुक्ला, राजेभाऊ साबळे, आशिष कराळे, सोनवणे, महिला प्रतिनिधी त्रिशला खैर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि योगा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. तान्हा पोळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी आणलेल्या मातीच्या बैलांची पूजा कोषाध्यक्ष राधेश्याम शुक्ला आणि तेजस्विता शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बैलांचे परीक्षण करण्यात आले. महेंद्र खैर आणि श्रीमती बुरघाटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. उत्कृष्ट बैल आणि देखावे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची तीन बक्षिसे देण्यात आली. याशिवाय, दोन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसेही मिळाली. ही बक्षिसे मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने आणि राधेश्याम शुक्ला यांच्यावतीने देण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटपही करण्यात आले. संकट मोचन बहुउद्देशीय मंडळ आणि योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पारंपरिक सणाच्या माध्यमातून नव्या पिढीला संस्कृतीशी जोडणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी मातीपासून बैलांच्या आकर्षक प्रतिकृती आणि सुंदर देखावे तयार केले. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये रमलेल्या मुलांना मातीशी जोडून पारंपरिक संस्कृतीचा अनुभव देण्याचा हा उपक्रम होता. मुलांच्या हातात काही तास मोबाईलऐवजी मातीचा बैल असावा आणि त्यांच्या मनात संस्कृतीची ओढ निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *