![]()
जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची आहे. सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसा मिंधे लक्षात राहील, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला आहे. उमेदवारांना मार
.
उद्धव ठाकरे म्हणाले, जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची आहे. सूर्याजी पिसाळ सारखा गद्दारीचा टिळा 400 वर्षे झाली तरी मिटला नाही तर या गद्दारांचे काय? सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्षे लक्षात राहिला तसा मिंधे लक्षात राहील, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
दोन गुजरात्यांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण मनाने काम करावे, समोरून धनाचा वर्षाव मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एकही जागा नतद्रष्टांच्या हाती द्यायची नाही. तसेच जे आता इथे आले आहेत ते सर्व निवडून आले पाहिजेत, असेही ठाकरेंनी म्हटले.
मुंबईसाठी ठाकरेंचा जाहीरनामा:घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, तर तरुणांना 1 लाखांपर्यंत सहाय्यता निधी
दरम्यान, दादर येथील शिवसेना भवनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे महानगरपालिका उमेदवारांसमोर एक महत्त्वाचे प्रेझेंटेशन सादर केले, ज्यामध्ये सत्ता आल्यास मुंबईच्या विकासासाठी नेमके काय करायचे, याबाबतचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला. हे प्रेझेंटेशन आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सुधारणा करून लवकरच मुंबईकरांसाठीचा अधिकृत ‘वचननामा’ जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापलिकेच्या मालकीची जमीन खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सोय करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलिस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार. तसेच मुंबई महापालिकेचे स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण असेल. इतकेच नव्हे तर पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी घरे दिली जातील, अशी आश्वासने आदित्य ठाकरे तसेच अमित ठाकरे यांनी दिली आहेत. शिवसेना आणि मनसे यांच्या वचननाम्यात मुंबईकरांसाठी काय आहे. वाचा सविस्तर
