.

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी श्रीरामपूर शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले. कब्रस्तानातील दफनविधी आटोपून परतत असताना बंटी जहागीरदार यांच्यावर संत लूक हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाच्या गेट समोर दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये हल्लेखोरांनी पोटात, छातीत आणि पायावर सहा राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर किती गोळ्या लागल्या याची अधिकृत माहिती समोर येईल. गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाल्यावर बंटी यांना कामगार हॉस्पिटल येथे दाखल केले होते. याची माहिती शहरात पसरल्यानंतर कामगार हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी जमा झाली. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, निरीक्षक नितीन देशमुख फौजफाट्यासह दाखल झाले. सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौकातही मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.
प्रतिनिधी | अहिल्यानगर बंटी जहागीरदार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दुपारी सुमारे ४ वाजता जखमी अवस्थेत जहागीरदारला नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरताच जहागीरदारला उर्वरित पान ४
मृतदेह संभाजीनगरला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळनंतर शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध नाही. तसेच जहागीरदार यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्याची माहिती समजताच मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तणाव व संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने जहागीरदार यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आला. विविध पोलिस ठाण्यात १९ गुन्हे दाखल मृत बंटी जहागीदार यांच्यावर श्रीरामपूरसह भिवंडी, मनमाड, नेवासा, पुणे येथे एकूण १९ गुन्हे दाखल असून त्यापैकी ११ नील असून एका गुन्ह्यात तडजोड झाली आहे. तर एका प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर सहा गुन्ह्यांचा तपास न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
दहशतीखाली श्रीरामपूर मागील वर्ष श्रीरामपूर शहर दहशतीच्या सावटाखाली होते. याआधीही शहरात गोळीबाराच्या लहान मोठ्या घटना घडल्या आहेत. २९ ऑगस्ट रोजी शहरातील शिवाजी रोडवर भर दुपारी एकावर गोळीबार करण्यात आला होता. गजबलेल्या वस्तीतून पळत संशयितांनी एकावर पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या होत्या. तर २६ नोव्हेंबरला श्रीरामपूर शहरामध्ये मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनांनंतर ३१ डिसेंबर रोजी भरदुपारी गोळीबार करून बंटी जहागीरदार यांची हत्या करण्यात आल्याने शहरात दहशतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांत दहशत कायम आहे.
