Harshwardhan Sapkal Slams BJP Karyakarta Mukt NCP Criminalization | भाजप आता ‘कार्यकर्तामुक्त पक्ष’ झाला: लवकरच रिमोट कंट्रोल रेशीमबागेकडून अदानी-अंबानींकडे जाईल; काँग्रेसची बोचरी टीका – Mumbai News



राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भारतीय जनता पक्षामध्ये अभूतपूर्व अराजकता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या निष्ठावंतांना डावलून ‘आयारामां’ना रेड कार्पेट अंथरल्याने कार्यकर्त्यांमध्ये त

.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, “नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये जो गोंधळ सुरू आहे, तो आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम असेल. मूळ भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून हा पक्ष आता ‘उपऱ्यांच्या’ हाती गेला आहे. मूळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल.”

अजित पवारांचा पक्ष गुंडांचा, याआधी माफियांना प्रवेश

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांचा पक्ष हा आता केवळ गुंडांचा आणि माफियांना आश्रय देणारा पक्ष उरला आहे. मराठवाड्यातील गुन्हेगारी साम्राज्यातील नेत्यांना आणि कोयता गँगशी संबंधित लोकांना त्यांनी पक्षात स्थान दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले, असे सपकाळ म्हणाले.

2026 काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष

सरत्या वर्षाला निरोप देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी नवीन वर्षातील काँग्रेसची रणनीती स्पष्ट केली. “2026 हे वर्ष काँग्रेससाठी पूर्णपणे ‘संघटनात्मक वर्ष’ असेल. डिसेंबरपासूनच आम्ही याची तयारी सुरू केली आहे. सध्या पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. नवीन वर्षात आम्ही वैचारिक मूठ बांधून अधिक ताकदीने जनतेसमोर जाणार आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा…

संभाजीनगर भाजपमधील गोंधळात संजय केणेकरांची मध्यस्थी:रडणाऱ्या कार्यकर्त्याला कुरवाळले; ‘सी-फॉर्म’ आणि सत्तेत पदे देण्याचे आश्वासन

महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. सावेंच्या गाडीला काळं फासणे आणि कराडांची गाडी रोखून धरल्याने निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी अखेर आमदार संजय केणेकर रिंगणात उतरले. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची आर्त हाक ऐकून घेत त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *