प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

पौष महिना म्हणजे भाकड मास याजुन्या समजुतीमुळे अनेकदा शुभकार्ये आणि महत्त्वाची बोलणी पुढे ढकलली जातात. मात्र, हा समजपूर्णतः चुकीचा असून धर्मशास्त्रआणि ज्योतिषशास्त्रानुसार पौषमहिना हा उपासना, दानधर्म आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचाआहे. सूर्य धनु राशीत असेपर्यंतविवाहाचे मुहूर्त नसले, तरी याकाळात विवाहाची बोलणी करण्यास हरकत नाही. उलट शिवलिंगावरतुपाचा अभिषेक, शाकंभरी नवरात्रोत्सवामुळे या महिन्यालाविशेष आध्यात्मिक वलय प्राप्त झाले आहे. गैरसमज दूर करत धर्मशास्त्राचा खरा आधार घेण्याचे आवाहनधर्मशास्त्र अभ्यासकांनी केले आहे.
‘रुढी बलियेसी’चा चुकीचा अर्थ: पौष महिन्यात शुभकार्य टाळण्यामागे ‘रुढी बलियेसी’ यावचनाचा दाखला दिला जातो. मात्र धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते,शास्त्रातून निर्माण झालेली रुढीच मान्य आहे.
पौष महिन्याविषयी असलेले गैरसमज दूर करा
पौष महिन्यात थंडीमुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पूर्वी लोकमहत्त्वाची कामे टाळत असत. कालांतराने याच कारणावरून पौष महिनाअशुभ असल्याची धारणा तयार झाली. मात्र याला धर्मशास्त्रीय किंवाज्योतिषीय आधार नसल्याचे पांडव यांनी सांगितले.
दिव्य मराठी नॉलेज: या गोष्टी करणे ठरेल शुभ १. पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरूहोतो. या दिवसापासून माघस्नानालाप्रारंभ करावा. २. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हाशाकंभरी देवीचा महोत्सव शारदीयनवरात्रोत्सवासारखा असतो. ३. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेलतर शिवप्रीत्यर्थ स्नान, जप, होम तर्पण वब्राह्मण भोजन करावे. ४. पौष अमावास्येला अधोंदय पर्व आलेअसता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत. ५. शिवलिंगावर महिनाभर तुपाचाअभिषेक करावा. दीपाराधना करावी. ६. पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीलाउपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजाकरावी. ७. दुर्गेची मूर्ती पिठाची करावी. व्रतानिमित्तआठ कुमारिकांना भोजन घालावं. ८. महिनाभर एकवेळ उपवास करून जेशक्य असेल ते दान करावं.
लग्नाची बोलणी करा- अनंत पांडव गुरुजी, धर्मशास्त्र अभ्यासक अर्धा मास सूर्य मकर राशीमध्येअसतो. मकर संक्रांती उत्सवसाधारण जानेवारी १४ तारखेलायेतो. मकर संक्रांतीच्या काळातअयन बदलतो. सूर्याचा मकर राशीतप्रवेश करणारा सूर्याचा रथघोड्याऐवजी गाढवामध्ये बदलतो.ह्या गाढवाला खर संबोधले आहे.म्हणून या महिन्याला खरमासदेखील म्हणतात. त्यासाठी विवाहनिषिद्ध मानतात, परंतु विवाहाची बोलणी करता येते.
विवाह व गृहप्रवेशाबाबतत ज्ज्ञांकडून स्पष्टता
या महिन्यात विवाह निषिद्ध नाही.फक्त सूर्य धनु राशीत असतानाविवाह मुहूर्त टाळावेत, असे शास्त्रसांगते. उर्वरित काळात योग्यग्रह-नक्षत्र असल्यास विवाह करतायेतो. विशेष म्हणजे श्री खंडोबाआणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाहपौष महिन्यातच शुक्ल त्रयोदशीलापाली येथे होता, असा उल्लेखपरंपरेत आढळतो. गृहप्रवेश,वास्तुशांती करू नये. केवळ नवीनघराचे मुख्य बांधकाम सुरू करता येते.
