राज्यातील 3 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या: डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे नाशिकची, तर अरुण एम. यांच्यावर गडचिरोलीची जबाबदारी – Mumbai News

राज्यात नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर, राज्य प्रशासनाने आज तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्याची कन

.

आज जाहीर झालेल्या आदेशानुसार, वित्त मंत्रालयातील सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकारी शैला ए. यांची आता मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मूळच्या ठाणे जिल्ह्याच्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांची नाशिक जिल्ह्यातील ‘आयटीडीपी’ प्रकल्पावर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नाशिकमधील आदिवासी विकास प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. 2023 च्या बॅचचे अधिकारी अरुण एम. यांची गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भागात प्रशासकीय घडी बसवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

बदल्यांचे सत्र सुरूच

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण असताना गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरू आहे. यापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्रिगुण कुलकर्णी यांची ‘यशदा’ (पुणे) येथून 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर आणि अंजली रमेश या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *